‘धर्मवीर’ बोलण्यात वावगं नाही’, पवारांच्या वक्तव्यानं अजितदादा तोंडघशी?

मुंबई तक

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटलं तरी वावगं नाही, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटकारलं आहे. धर्मवीर म्हटलं काय किंवा स्वराज्यरक्षक म्हटलं काय, त्याबाबत वाद नकोत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पवार यांच्या या वक्तव्याने अजित पवार तोंडघशी पडले आहेत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटलं तरी वावगं नाही, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटकारलं आहे. धर्मवीर म्हटलं काय किंवा स्वराज्यरक्षक म्हटलं काय, त्याबाबत वाद नकोत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पवार यांच्या या वक्तव्याने अजित पवार तोंडघशी पडले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची आज शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नातू पार्थ पवारही उपस्थित होते. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असं विधान अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अधिवेशनात बोलताना केलं होतं. यावरुन सध्या राज्यभर वातावरण तापलं आहे. भाजपने त्यांच्याविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. तसंच पवार यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली जात आहे. याच वादावर आज शरद पवार यांनीही भाष्य केलं.

काय म्हणाले शरद पवार?

“छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा आणि ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा, त्यावरुन वाद नको. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं तरी अयोग्य नाही. धर्मवीर, स्वराज्य रक्षक या दोन्ही उपाधी योग्यच आहेत”

हे वाचलं का?

    follow whatsapp