Sanjay Raut: ‘योगी-भोगी’वरुन राऊतांचा राज ठाकरेंना टोमणा
मुंबई: योगी सरकारने उत्तर प्रदेशातील 11 हजार भोंगे हटविण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड कौतुक केलं. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरुन राज्यातील ठाकरे सरकारवर मात्र टीका केली. याच मुद्द्यावरुन शिवसेना खास संजय राऊत यांनी मात्र राज ठाकरेंना जोरदार टोमणा लगावला आहे. ‘आता योगी कोण, भोगी कोण आणि हे योगी-भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं अचानक हा […]
ADVERTISEMENT

मुंबई: योगी सरकारने उत्तर प्रदेशातील 11 हजार भोंगे हटविण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड कौतुक केलं. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरुन राज्यातील ठाकरे सरकारवर मात्र टीका केली. याच मुद्द्यावरुन शिवसेना खास संजय राऊत यांनी मात्र राज ठाकरेंना जोरदार टोमणा लगावला आहे.
‘आता योगी कोण, भोगी कोण आणि हे योगी-भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं अचानक हा एक संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करायची असेल तर करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा.’ असं म्हणत संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
‘भोंग्यांवरुन वातावरण तापविण्याचा प्रयत्न’