संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई तक

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. कारण संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतल्या गोरेगावमधल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत मागचे ५० दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर तसंच कोठडीबाबत आज एकत्रित सुनावणी पार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. कारण संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतल्या गोरेगावमधल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत मागचे ५० दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर तसंच कोठडीबाबत आज एकत्रित सुनावणी पार पडली.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. १ हजार कोटींच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. मात्र आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. तसंच तुम्ही आरोपपत्र देत नाही तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करत असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै ला उशिरा अटक

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलैला उशिरा अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली. तेव्हापासून संजय राऊत हे ईडी कोठडीत होते. न्यायालयाने त्यांना दुसऱ्यांदा दिलेली ईडी कोठडी आज संपत असल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होते आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही अडचणी वाढल्या आहेत कारण ईडीने त्यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं.

मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यावरून ईडीने या प्रकरणाचा मनी लाँडरिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांचं नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याची चौकशी सुरू केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp