मुंडे भगिनींवर नेमका कुणाचा राग आहे? विधान परिषदेवरून शिवसेनेचा भाजपला खोचक सवाल

मुंबई तक

राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधान परिषद निवडणूकही जवळ आली आहे. यासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल असं वाटलं होतं. मात्र तसं झालेलं नाही. त्यावरून विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. अशात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात मुंडे भगिनींवर कुणाचा राग आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधान परिषद निवडणूकही जवळ आली आहे. यासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल असं वाटलं होतं. मात्र तसं झालेलं नाही. त्यावरून विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. अशात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात मुंडे भगिनींवर कुणाचा राग आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे याच नर्मदेच्या गोट्यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे असं म्हणत शिवसेनेने हा प्रश्न विचारला आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

महाराष्ट्रात भाजपच्या कृपेने राज्यसबेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होतं आहे. राज्यसभेसाठी मतदान होतं आहे त्यानंतर लगेच विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या. कारण राजकीय पक्षांच्या आमदारांचे मतदान गुप्त पद्धतीचं नसतं. आपण कुणाला मतदान केलं हे प्रतोदांना दाखवून मतपत्रिका पेटीत टाकायची असते.

हे वाचलं का?

    follow whatsapp