'मोदीजी तुमच्या हरकती पाहून असं वाटतंय आता गोष्ट तुमच्या राजीनाम्यापर्यंत...', दिपकेचा नवा Video

मुंबई तक

Abhijit Dipke on PM Resignation: 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP)संस्थापक अभिजीत दिपकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचे आवाहन केले आहे. त्याने म्हटले आहे की, असे न केल्यास आंदोलन पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत वाढेल.

ADVERTISEMENT

accept dharmendra pradhan resignation or else modiji matter will come down to your own resignation abhijit dipake demand to pm
अभिजीत दिपके
Google CTA

नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक आणि प्रमुख अभिजीत दिपकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचे आवाहन केले आहे. त्याने म्हटले आहे की, असे न केल्यास आंदोलन केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरते मर्यादित राहणार नाही, तर पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाईल. अभिजीत दिपके यांच्या आवाहनाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अभिजीत दिपके यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा CJP ने उद्या, (24 जुलै) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीने केले आहे. हे आंदोलन पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात आयोजित केले जात आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत.

...तर तुम्हाला कोणीही मत देणार नाही - अभिजीत दिपके

देशव्यापी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. अभिजीत दिपके म्हणाले,

"तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर, गोष्ट तुमच्या राजीनाम्यापर्यंतही येईल जशा तुमच्या हरकती आहेत ते पाहता गोष्ट तुमच्या राजीनाम्यापर्यंत येईलच.. एवढं तर मी तुम्हाला सांगतो की, ही गोष्ट येणारच..  एक अकार्यक्षम आणि अयशस्वी मंत्री या देशातील लाखो विद्यार्थ्यांपेक्षा मोठा असू शकत नाही. जर सरकार लाखो विद्यार्थ्यांपेक्षा एका अकार्यक्षम मंत्र्याला जास्त महत्त्व देत असेल, तर लक्षात ठेवा की भारतातील कोणताही विद्यार्थी किंवा तरुण तुम्हाला निवडणुकीत मत देणार नाही."

त्यांनी असा आरोप केला की, सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे.