Devendra Fadnavis: "एखादी बँक जर महिलांच्या हाती असेल, तर...", चंद्रपूरमध्ये CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

मुंबई तक

CM Devendra Fadnavis: "सहकारी बँकांमध्ये जाताना लोकांच्या मनात एक आपुलकी असते. आपलुकी निश्चितपणे असली पाहिजे, पण दिलेलं कर्ज हे परत घेताना मात्र तेव्हढ्याच शिस्तित ते परत घेतलं पाहिजे".

ADVERTISEMENT

CM Devendra Fadnavis On Saif Ali Khan Attack Case
CM Devendra Fadnavis On Saif Ali Khan Attack Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सहकारी बँकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

point

"आपल्याजवळ असलेल्या पैशांमध्ये आपल्या गरजा..."

point

CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis Speech :  "एखादी बँक जर महिलांच्या हाती असेल, तर ती बँक चांगलीच चालेल. कारण महिलांना अर्थकारण नीट समजतं. आपल्याजवळ असलेल्या पैशांमध्ये आपल्या गरजा भागवून त्यातून बचत करायची आणि सणासुदीला, घरच्या कार्यासाठी पैसा उभा करायचा. अशा प्रकारचं काम आपल्या गरिब महिला करतात. हेच काम मोठ्या प्रमाणाक केलं तर ती बँक होते आणि हेच काम त्याही मोठ्या प्रमाणात केलं तर ती राज्याची किंवा देशाची अर्थव्यवस्था असते. देशाची अर्थव्यवस्था आणि घरची अर्थव्यवस्था यात फार फरक नाहीय. त्यात पैसा येतो किती आणि जातो किती? जास्त पैसा लागला तर कुठून घ्यायचा? घेतला तर कुठून परत करायचा? हेच आपल्याला देशातही करावं लागतं. राज्यातही करावं लागतं, तेच अशाप्रकारच्या सर्व संस्था चालवताना करावं लागतं, असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये केलं आहे.

जनतेला संबोधीत करताना फडणवीस पुढे म्हणाले, "वेगवेगळे कायदे, त्यात तरतुदी याचं पालन करत कुठेही सीआर, मानकांना छेद न देता आपली बँक चालवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे खरं आहे की, शेवटी अशाप्रकारची बँक चालवत असताना, आमचा सहकार हा यशस्वी झाला. याचं कारण सहकारामध्ये आपुलकी आहे. सहकारी बँकांमध्ये लोक जातात. कारण लोकांचा विश्वास असतो की ही संचालक मंडळे आपली आहेत. आपली सेवा करण्यासाठी ही मंडळे आहेत. त्यामुळे सहकारी बँकांमध्ये जाताना लोकांच्या मनात एक आपुलकी असते. आपलुकी निश्चितपणे असली पाहिजे, पण दिलेलं कर्ज हे परत घेताना मात्र तेव्हढ्याच शिस्तित ते परत घेतलं पाहिजे. हे सुरुवातीला जमलं नाही, म्हणून 39 टक्क्यापर्यंत एनपीए गेला आणि जसं जमलं तसं तुम्ही तो एनपीए एक टक्क्याच्याही आत आणला.

हे ही वाचा >>Dhananjay Deshmukh: "उद्या गावकऱ्यांच्या मिटिंगमध्ये..." संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुखांचं मोठं विधान!

"कर्ज दिली आणि कर्ज परत घेतली, हे जे काही तुम्ही करून दाखवलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आज 300 कोटीची बँक तयार झालेली आहे. 300 कोटीची बँक असूनही त्यात नेट एनपीए कमी असणं हे निश्चितपणे संचालक मंडळ आणि बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी योग्य प्रकारे बँक चालवली आहे. याचं हे प्रशस्तीपत्र आहे. म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. सहकाराच्या क्षेत्रात, नागरी सहकारी बँकांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांनी खूप प्रगती केली. महाराष्ट्रातल्या अनेक नागरि सहकारी बँका या शेड्युल बँकांना किंवा राष्ट्रीयकृत बँकांना, कमर्शियल बँकानादेखील त्या ठिकाणी कॉम्पिटिशन देतायत", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा >> संतोष देशमुखांच्या हत्येनंतर फरार झालेल्या कृष्णा आंधळेबाबत कोर्टाचा प्रचंड मोठा आदेश

हे वाचलं का?

    follow whatsapp