CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर, कोणत्या मंत्र्यांनी मारलीय बाजी,  कोण ठरलंय सरस?

मुंबई तक

CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर केला आहे. ज्यात महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये 5 मंत्रालयीन विभागाचे सचिव, 5 मंत्रालयीन विभागाचे आयुक्त, 5 जिल्हाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. जाणून घ्या कुणाची कामगिरी दमदार...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा १०० दिवसांचा निकाल

point

सर्वोत्तम जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे

point

सर्वोत्तम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये ठाणे अव्वल

point

सर्वोत्तम विभागीय आयुक्तांमध्ये कोकण अव्वलस्थानी

Maharashtra News: राज्यातील फडणवीस सरकारमध्ये कोणाचं काम कसं आहे याचा 100 दिवसांचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल आहे. 1 मे 2025  रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. यात वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारणा, सुलभ जीवनमान, गुंतवणूक चालना तसेच तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणारी मंत्रालयं, अधिकारी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये 5 मंत्रालयीन विभागाचे सचिव, 5 मंत्रालयीन विभागाचे आयुक्त, 5 जिल्हाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे 5 पोलीस अधीक्षक, 5 जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, 4 महापालिका आयुक्त, 3 पोलीस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलीस परिक्षेत्रे महानिरिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या पथकाने प्रभावी आणि कल्पकतेने अंमलबाजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या हातून भविष्यात चांगले कार्य घडावे असे  ट्विट करत त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. 

हे ही वाचा >> अजित पवार निधी वाटणार, पण 'या' मंत्र्यांची सुद्धा नजर असणार, फडणवीसांची रणनीती काय?

विशेष कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे अंतिम मूल्यामापन केले. यानंतर 100 दिवसांच्या कार्यालयाच्या विशेष मोहिमेअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे: 

सर्वोत्तम कामगिरी करणारे विभाग :

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागात मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि  बालविकास विभाग 80 टक्के, सार्वजनिक बांधकाम विभागाने 77.95 टक्के कामगिरी केली असल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाला 61.15 टक्के, ग्राम विकास विभागाला 63.85 टक्के गुण देण्यात आलेत आहे. तर परिवहन व पाटबंदरे विभागाला 61.28 टक्के सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या यादीत स्थान मिळालं आहे.

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

चंद्रपूर जिल्हाधिकारी - 84.29 टक्के 
कोल्हापूर जिल्हाधिकारी - 81.14 टक्के 
जळगाव जिल्हाधिकारी - 80.86 टक्के 
अकोला - 78.86 टक्के 
नांदेड जिल्हाधिकारी - 66.86

या जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून यावेळी नावाजण्यात आले आहे. 

सर्वोत्तम पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षकांमध्ये पालघरच्या पोलीस अधीक्षकांचे स्थान अव्वल आहे. ज्यात पालघर पोलीस अधीक्षकांना 90.29 गुण देण्यात आले आहेत. पाहा यादीत नेमकं कोणाकोणाला स्थान मिळालं आहे.

पालघर, पोलीस अधीक्षक - 90.29 टक्के 
गडचिरोली, पोलीस अधीक्षक - 80 टक्के 
नागपूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक - 80 टक्के 
जळगाव, पोलीस अधीक्षक-  65.71 
सोलापूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक - 64 गुण

सर्वोत्तम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये ठाणे अव्वल

सर्वोत्तम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये ठाण्याचा प्रथम क्रमांक आहे. त्यांना तब्बल 92 टक्के गुण देण्यात आले आहेत. पाहा याशिवाय या यादीत नेमकं कोणाकोणाल स्थान मिळालं आहे. 

हेही वाचा >> "पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाला 50 लाख आणि..." मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे - 92.00 टक्के
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर - 79.43 टक्के 
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक - 75.43 टक्के
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे - 75.43 टक्के
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम - 72.00 टक्के 

सर्वोत्तम महापालिका आयुक्त

दरम्यान, सर्वोत्तम महापालिका आयुक्तांमध्ये उल्हासनगर अव्वलस्थानी आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या सर्वोत्तम आयुक्त म्हणून 86.29 टक्के गुण मिळाले आहेत. पाहा सर्वोत्तम महापालिका आयुक्तांमध्ये नेमकं कोणाला कितवा नंबर मिळाला आहे.

महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर - 86.29 टक्के
महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड - 85.71 टक्के
महानगरपालिका आयुक्त, पनवेल - 79.43 टक्के
महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई- 79.43 टक्के

सर्वोत्तम पोलीस आयुक्त

सर्वोत्तम पोलीस आयुक्तांमध्ये मीरा-भाईंदरच्या आयुक्तांना अव्वल स्थान मिळाले असून त्यांना 84.57 टक्के गुण देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत. ज्यांना 73.14 टक्के गुण मिळाले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त आहेत. ज्यांना 73.14 टक्के  देण्यात आले आहेत. 

सर्वोत्तम विभागीय आयुक्त

सर्वोत्तम विभागीय आयुक्तांमध्ये कोकण अव्वलस्थानी आहे, ज्यांना 75.43 टक्केवारी देण्यात आली आहे. तर विभागीय आयुक्त नाशिक आणि नागपूर यांना दुसरा क्रमांक विभागून देण्यात आला आहे. ज्यांची टक्केवारी ही समसमान म्हणजे 62.69 टक्के एवढी आहे.

सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षकांची टक्केवारी

सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षकांमध्ये कोकण अव्वल स्थानी आहे. कोकणाला या विभागासाठी सर्वाधिक 78.86 टक्के गुण देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक नांदेड यांना 61.14 टक्के गुण मिळाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp