“शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब

साहिल जोशी

ADVERTISEMENT

India today conclave mumbai 2023 : Devendra Fadnavis claim that Sharad Pawar suggested President's Rule in Maharashtra in 2019
India today conclave mumbai 2023 : Devendra Fadnavis claim that Sharad Pawar suggested President's Rule in Maharashtra in 2019
social share
google news

Devendra Fadnavis Sharad Pawar President Rule India Today Conclave Mumbai 2023 : 2019 मध्ये घडलेल्या सत्तानाट्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडियाच शरद पवार यांची होती. याबद्दलचा पडद्यामागे घडलेला सर्व घटनाक्रमही फडणवीसांनी सांगितला. (in 2019 Sharad Pawar suggested President’s Rule in Maharashtra, said devendra fadnavis)

‘India Today Conclave Mumbai 2023’मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. 2019 मध्ये पडद्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात झालेल्या चर्चेबद्दल फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. 2019 जे घडलं, त्यात शरद पवारांची भूमिका काय होती? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण सत्य ऐकण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. कारण राजकारणात हे पूर्णपणे मांडण्याची एक वेळ असते. तुम्हाला योग्य वेळी हीट करायचं असतं.”

2019 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीसांना काय प्रस्ताव दिला?

“मी इतकंच सांगेन २०१९ मध्ये जेव्हा शिवसेनेने आम्हाला धोका देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली. आमच्या लक्षात आले की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावतेय. ते आता आपल्यासोबत येणार नाही. त्यावेळी आम्ही विचार करत होतो की यावर उपाय काय? त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की, आम्ही येऊ शकतो कारण आम्हाला तीन पक्षाचं सरकार नकोय. आम्हाला स्थिर सरकार हवं. मी त्यांना सांगितलं की, चर्चा करून सांगतो.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?

“नंतर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांसोबत आमची बैठक झाली. शरद पवारांनी हे सांगितलं की आम्ही भाजपसोबत येऊ. माझ्यावर आणि अजित पवारांवर जबाबदारी टाकली गेली. आम्ही युती कशी असेल, कुणाला कोणतं खातं मिळेल, कुणाला कोणता जिल्हा मिळेल, हे ठरवलं. युती करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. तर त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. त्यानंतर विचार करून राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली.”

ऐनवेळी शरद पवारांनी यू टर्न घेतला -देवेंद्र फडणवीस

“त्यानंतर एका दिवशी पहाटे शरद पवारांनी आपला निर्णय बदलला. त्यानंतर अजित पवारांना वाटलं की, हे योग्य नाही. कारण आपण इतके पुढे गेलो आहोत आणि त्यानंतर या प्रकारे निर्णय बदलणे, हा विश्वासघात होईल. त्यामुळे त्यांनी सांगितलं की, मी तर भाजपसोबत जाईन. त्यांनी हे शरद पवारांनाही हे सांगितलं. कारण तुम्ही ही आघाडी केली आणि या टप्प्यावर हे बदलू शकत नाही. त्यानंतर आम्ही शपथ घेतली. त्यानंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे”, असा घटनाक्रम फडणवीसांनी सांगितला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> India Today conclave mumbai : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार? फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले…

“आम्ही त्यावेळी चर्चा अजित पवारांसोबत केली नव्हती. आम्ही चर्चा शरद पवारांसोबत केली होती. शरद पवारांशी बोलून निर्णय झाला होता. शरद पवारांच्या संमतीनंतरच अजित पवार आणि मी बसलो होतो.”

OBC Politics Election 2024 : ओबीसी व्होट बँक राजकारणात किती मोठी गेमचेंजर?

‘शरद पवार असं म्हणतात की, भाजपसोबत जाण्यास तयार नव्हतो. मी जे केलं त्यामुळे भाजप-शिवसेनेत फूट पडली आणि विरोधकांना फायदा झाला. ही एक चाल होती, ज्यात भाजप अडकली’, या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, “बघा, ते नव्या नव्या गोष्टी सांगत असतात. एक दिवस त्यांनी सांगितलं की, राष्ट्रपती राजवट उठवायची होती म्हणून मी हे केलं. आता मी तुम्हाला त्याचं पूर्ण सत्य सांगतो. हे मी राखून ठेवलं होतं. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पनाच शरद पवारांची होती. शरद पवारांनी सांगितलं की, मी इतक्या लवकर भूमिकेवरून यू टर्न घेऊ शकत नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा.”

ADVERTISEMENT

शरद पवारांची काय होती खेळी, फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

“राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन. नंतर मी भूमिका घेईन की, महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं यासाठी आम्ही भाजपसोबत जात आहोत. इतकंच नाही, तर त्यापुढचंही सांगतो. राष्ट्रपती राजवट जेव्हा लागते, तेव्हा प्रत्येक पक्षाला पत्र देऊन विचारलं जातं की, तुम्ही सरकार बनवणार का? तसंच पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं गेलं. आणि आम्ही सरकार बनवणार नाही, हे जे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं ते मी टाईप केलं होतं. ते माझ्या घरी टाईप केलं होतं. त्यात शरद पवारांनी दुरुस्ती करायला सांगितली. ते बदल करून राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र दिलं गेलं. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. बघा शरद पवार मोठे व्यक्ती आहेत. अनेक गोष्टी बोलतात, पण सत्य हे आहे की, शिवसेनेने विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवारांनीच आमच्यासोबत चर्चा केली होती. आमच्यासोबत सरकार बनवू इच्छित होते.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT