CM Eknath Shinde: 'टोलवाटोलवी करू नका', मुख्यमंत्री शिंदे एवढे कोणावर संतापले?
CM Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत रस्त्यावरील खड्डे हा मुद्दा शिंदे सरकारला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी अधिकांऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुुंबई आणि नजीकच्या जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर प्रचंड खड्डे

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सरकारवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
CM Eknath Shinde angry: मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता बैठकांचा धडाका सुरू केलं आहे. दरम्यान, यावेळी कारणं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच कानउघाडणी केली असल्याचं आता समोर आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळेच आता या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत स्वत: मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. (dont cheat road potholes may add to difficulty in vidhan sabha election cm eknath shinde was angry with the officials)
रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे संतापले
मुंबईला जोडणाऱ्या एमएमआर (MMR) रिजन म्हणजेच ठाणे, रायगड, पालघर, भिवंडी, जेएनपीटी रस्त्यावरील खड्डे आणि प्रलंबित कामांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबतच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : खात्यात एक रुपया पोहोचलाच नाही, 'त्या' 16 लाख महिला अर्जदारांचं काय होणार?
रस्ते दुरूस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामचुकारपणा केला तर त्याच्यावर एफआयआर दाखल करा अशी तंबीच मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
'तातडीने कामं सुरू करा, कारणं सांगून टोलवाटोलवी करू नका..' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे बरेच संतापल्याचे दिसून आलं.