दहशतवादी ते भारतासाठी प्राण देणारा काश्मिरी... तुमच्याही डोळ्यात पाणी येईल अशी आहे नझीर वाणीच्या शेवटच्या ऑपरेशनची कहाणी!
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. पण याच दरम्यान, आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत जी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
ADVERTISEMENT

जम्मू-काश्मीर: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण काश्मीरमधील वातावरण हे ढवळून निघालं आहे. अनेकजण हे स्थानिक काश्मिरी नागरिकांवर टीकाही करत आहे. अशावेळी या हल्ल्यानंतर अनेक स्थानिक काश्मिरींनी या हल्ल्यातील जखमी पर्यटकांना आणि त्यांच्या बायका-मुलांना मदत केल्याचं समोर आलं होतं. पण काश्मिरी नागरिक हे मदतीपुरताच मर्यादित नाहीत. दहशतवाद काश्मीर खोऱ्यातून कायमचा नष्ट व्हावा यासाठी प्राण देणारे काश्मिरी देखील याच मातीत आपल्याला सापडतात. अशाच एका काश्मिरी नागरिकांच्या सर्वोच्च बलिदानाची कहाणी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जी वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यात आसवं उभी राहतील.
ही कहाणी आहे नझीर वाणी याची.. जो कधीकाळी दहशतवादी होता. पण त्याने अखेरचा श्वास घेतला तो भारतमातेच्या रक्षणासाठी...
2004 साली नझीर वाणीने आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर लवकरच नझीर भारतीय सैन्यात भरती झाला. एकेकाळी सैन्याविरुद्ध लढणाऱ्या या शूर जवानाने नोव्हेंबर 2018 मध्ये दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी आपले प्राण अर्पण केले. पण त्याच्या शेवटच्या लढाईची कहाणी अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे.
लेफ्टनंट जनरल सतीश दुवा (निवृत्त) यांनी 'लल्लनटॉप'च्या मुलाखतीत नझीर वाणीचा दहशतवाद ते लष्कराचा सैनिक या सगळा प्रवास सांगितला. एवढंच नव्हे तर त्याचं शेवटचं ऑपरेशन कसं झालं याची कहाणी देखील सांगितली.










