Gram Panchayat Election 2023 LIVE : अजित पवार गटाच्या पॅनलवर पैसे वाटल्याचा आरोप

प्रशांत गोमाणे

ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी अनेक ठिकाणी राजकीय नेते या निवडणुकांमध्ये थेट सहभागी आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Gram Panchayat and Sarpanch Election : राज्यात आज 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडतेय. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत हे मतदान पार पडणार आहे. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 6 नोव्हेंबरला होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी अनेक ठिकाणी राजकीय नेते या निवडणुकांमध्ये थेट सहभागी आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अजित पवार गटाच्या पॅनलवर पैसे वाटल्याचा आरोप

Katewadi Gram Panchayat Elections : बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी या गावांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये बहुजन ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांनी राष्ट्रवादी गटाच्या पॅनल कडून पैसे वाटल्याचा आरोप केलाय..तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसून जाणीवपूर्वक काही गाव पुढारी गावाला वेठीस धरून काम करीत असल्याचा आरोप देखील बहुजन ग्रामविकास पॅनलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावामध्ये केलेल्या विकास कामांमुळे जनता आमच्या पाठीशी असल्याचा निर्धार राष्ट्रवादी पुरस्कृत जय भवानी माता पॅनलचे प्रमुख विद्याधर काटे यांनी केला.. उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या ग्रामपंचायत मध्ये आमचाच झेंडा रोवला जाईल असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं..तर पांडुरंग कचरे यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावत त्यांच्याकडूनच पैसे वाटले गेले असल्याचा आरोप काटे यांनी केला…

बीड जिल्ह्यात 18 गावांचा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार

Beed Gram Panchayat Election 2023 : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत साठी मतदान होत असताना या 18 गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. गेवराई तालुक्यातील महत्वाची मानली जाणारी धरावंटा येथे सात सदस्य आणि सरपंच पद हे ओबीसी पदासाठी जागा आसतानाही मराठा समजला पाठींबा देण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे या साठी निवडणूक होणार होती. परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभागी होणार नसल्याच ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp