INDIA vs NDA : रणनीती ठरली! 11 नेते, सचिवालय… आता मुंबईत बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rahul Gandhi said said that this fight is against the ideology of BJP. This is a fight between NDA and 'INDIA'.
Rahul Gandhi said said that this fight is against the ideology of BJP. This is a fight between NDA and 'INDIA'.
social share
google news

Opposition Unity India : देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया अशी राजकीय लढत बघायला मिळणार आहे. एकीकडे दिल्लीत भाजप प्रणित एनडीएची बैठक सुरू असताना 26 विरोधकांच्या आघाडीला नवं नाव निश्चित करण्यात आलं. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, बंगळुरूत झालेल्या बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली.

पाटण्यातील बैठकीनंतर 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बंगळुरूत बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधकांच्या बैठकीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स म्हणजे इंडिया या नावाची घोषणा केली. विरोधी पक्षांत समन्वय राहावा, किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी एक समिती आणि कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. एनडीए विरोधात लढा देण्यासाठी तयार केलेल्या रणनीतीवर आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

वाचा >> Kirit Somaiya यांच्या आक्षेपार्ह Video प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची सभागृहात ‘ती’ मोठी घोषणा

या बैठकीनंतर बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी माहिती दिली. “सोनिया गांधी, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांच्यासह 26 पक्षांचे नेते बैठकीला हजर होते. लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीने ही बैठक खूप महत्त्वाची होती. काही ठराव या बैठकीत मांडण्यात आले, या सर्वांनी ते मंजूर केले. या आघाडीसाठी नवे नाव सुचवण्यात आले, ज्याला सर्वांनी पाठिंबा दिला”, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘इंडिया’ची पुढची बैठक मुंबईत

“आधी युपीए म्हणून काम केले. आता 26 पक्षांनी नवीन नाव दिले असून, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स म्हणजे इंडिया. सर्वांनी एकमताने हे नाव निवडलं आहे. 11 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. ते लवकरच निवडले जातील. ‘इंडिया’ची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. त्याच बैठकीत समन्वय समितीतील नेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील. बैठकीची तारीख लवकरच जाहीर करू”, अशी माहिती खरगे यांनी यावेळी दिली.

वाचा >> Kirit Somaiya : नीलम गोऱ्हेंसमोरच काढला व्हिडीओंचा पेन ड्राईव्ह, अंबादास दानवे म्हणाले…

“इंडियांचं सचिवालय लवकरच स्थापन केले जाईल. प्रचाराचं व्यवस्थापन ठरवण्याचं काम येथून होणार आहे. हे कार्यालय दिल्लीत असेल, कारण हे ठिकाण सगळ्यांसाठी सोयीचे आहे”, असं खरगे म्हणाले.

ADVERTISEMENT

सीबीआय, ईडीचा विरोधकांविरोधात वापर

केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याविरोधात वापर केला जात असल्याचा पुनरुच्चार मल्लिकार्जून खरगे यांनी केला. ते म्हणाले, “भाजपचे सरकारला या देशातील लोकशाही उद्ध्वस्त करायची आहे. संविधान उद्ध्वस्त करायचं आहे. स्वायत्त संस्थांचा हे सरकार वापर करत आहे. सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा वापर विरोधक, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध वापरत आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक असून, देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशाला आणि लोकांना कसे वाचवायचे यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”

ADVERTISEMENT

‘…याचाच अर्थ नरेंद्र मोदी घाबरलेत’

“आता मोदीजींनी 30 पक्षांची एनडीएची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला 30 पक्ष आहेत, असं म्हणतात. ते पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत का? मी संसदेत आहे, पण अनेक पक्षांबद्दल कधी ऐकलं नाही. भाजपने त्यांच्यासोबत पक्षांची कधी काळजी केली नाही. त्यातील अनेक जण सोडून गेले. आता त्यांना बोलवताहेत. आता ते सगळे तुकडे पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच अर्थ असा की नरेंद्र मोदी विरोधकांना घाबरले आहेत”, असं टीकास्त्र मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधानांवर डागलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT