Maratha Reservation: मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंना ढसाढसा रडू लागले अन्...

मुंबई तक

Maratha Reservation and Manoj jarange: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सोडले, सरकारने त्यांच्या सहा मागण्या मान्य केल्या. पण त्याचवेळी आझाद मैदानात त्यांना व्यासपीठावर रडू कोसळलं.

ADVERTISEMENT

maratha reservation why did manoj jarange cry profusely in azad maidan
मनोज जरांगेंना रडू कोसळलं (Video Grab)
social share
google news

Manoj Jarange Crying: मुंबई: मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मंगळवारी (2 सप्टेंबर) उपोषण सोडले. सरकारने त्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य केल्या. तसेच हैदराबाद गॅझेट लागू करणारा जीआर देखील जारी केला. याचवेळी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावरील व्यासपीठावरच ढसाढसा रडू आलं. त्यांनी सांगितले की, ही लढाई सोपी नव्हती, परंतु मराठा समाजाच्या एकत्रित पाठिंब्याने त्यांना हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

पाच दिवसांहून अधिक काळ चाललेल्या या उपोषणादरम्यान जरांगे पाटील सरकारवर सतत दबाव आणत होते. त्यांनी सांगितले होते की, ठोस निर्णय होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. अगदी शेवटच्या क्षणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली की त्यांनी स्वतः येऊन त्यांचे उपोषण सोडवावे. पाटील म्हणाले की, जर फडणवीस आले तर जो कटूपणा आला आहे तो कमी होईल. पण मुख्यमंत्री फडणवीस हे त्यावेळी नागपूर दौऱ्यावर होते. त्यामुळे ते आता येऊ शकत नाही असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर, अखेर जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हाताने लिंबूपाणी घेत उपोषण सोडले.

हे ही वाचा>> Maratha Reservation: 'फसवं समाधान हवं असेल तर घ्या... 'तिथे' दाखले टिकत नाही', चंद्रकांत पाटलांनी उडवून दिली खळबळ

विजयाची घोषणा, जरांगेंना रडू कोसळलं

दरम्यान, जरांगे-पाटील यावेळी व्यासपीठावर भावुक झाले. ते म्हणाले, आम्हाला आधीच 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. आता सातारा गॅझिटेअरनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे देखील आरक्षणाच्या कक्षेत येतील. मी कधीही महाराष्ट्राला प्रदेशांमध्ये विभागलेले पाहिले नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे आणि हा विजय केवळ समाजाच्या पाठिंब्यानेच शक्य झाला आहे. याच घोषणेदरम्यान, मनोज जरांगेंना आपले अश्रू अनावर झाले. व्यासपीठावरच त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

सरकारी अध्यादेश आणि 5 महत्त्वाचे मुद्दे

सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अध्यादेश जारी केला आहे. त्यात पाच महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp