MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

राहुल गायकवाड

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या राजकीय भूमिका सातत्याने बदलत असतात. विशेषत: भाजपबाबत. आतापर्यंत राज ठाकरेंनी किती वेळा भूमिका बदलल्या हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Maharashtra Political updates : mns president raj thackeray love hate politics with bjp, how many times has the role changed so far
Maharashtra Political updates : mns president raj thackeray love hate politics with bjp, how many times has the role changed so far
social share
google news

Raj Thackeray vs BJP: मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध रंगल्याचं चित्र आहे. कर्नाटकातील भाजपचा पराभव त्याचबरोबर 2 हजाराच्या नोटबंदीवर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राज ठाकरेंवर भाजपचे नेते जोरदार टीका करता आहेत. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. ‘आपलं कोण वाकडं करु शकत नाही अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरु नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा’ असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याचबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणाम या निकालावर दिसत असल्याचे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. (mns chief raj thackerays love hate relationship with bjp how many times has the role changed so far)

आता 2 हजाराची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर देखील राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं. ‘नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात’ असं राज ठाकरे म्हणाले होते, त्याचबरोबर हा धरसोडपणा असून सरकार असं चालतं का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

आता यावर आमच्या बड्या नेत्यांवर बोलाल, तर मुलाहिजा ठेवणार नाही असं वक्तव्य आशिष शेलारांनी भर सभेत केलं. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. गेल्या काही काळामध्ये भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या वाढलेल्या भेटीगाठीवरुन येत्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा असताना आता एकमेकांवर विखारी टीका सुरु झाल्याचे चित्र आहे.

2014 पासून राज ठाकरेंच्या भाजपबाबत भूमिका कशा बदलत गेल्या हे आपण पाच मुद्यांमध्ये समजून घेऊया

1. तुम्हाला आठवत असेल तर 2014 च्या आधी राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा केला होता. त्यावेळी गुजरातच्या विकासावर राज ठाकरेंनी भरभरुन कौतुक केलं होतं. मोदींच्या गुजरात मॉडेलचं देखील राज ठाकरेंनी कौतुक केलं. होतं. मनसेच्या 8व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठीचा आपला पाठिंबा जाहीर केला होता. मोदी हेच पंतप्रधान कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा राज ठाकरे प्रयत्न करत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp