Nitish Kumar : अमित शाहांची भेट अन् 50 दिवसांत असं बदललं बिहारचं राजकारण, Inside Story

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

bihar political crisis : Just 50 days and the political equations of Bihar changed completely.
bihar political crisis : Just 50 days and the political equations of Bihar changed completely.
social share
google news

Nitish Kumar Marathi : राजकीय भूकंपाचे हादरे आणि बिहारचं राजकारण हे आता समीकरण बनलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उत्तर भारतातील या राज्यात सातत्याने राजकीय उलथापालथ होत आहे. हे ज्या ज्या वेळी घडतं, त्यावेळी एक नाव हमखास असतं आणि ते म्हणजे नितीश कुमार यांचं!

लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आल्यानंतर नितीश कुमारांनी मरेन पण भाजपसोबत जाणार नाही, असं म्हटलं. तर अमित शाहांनी जाहीर सभेत सांगितलं की, नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद झालेत. पण, या गोष्टींचा विसर पडण्याआधीच बिहारमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल लागली. नितीश कुमार भूमिका बदलतील असंही कुणालाही वाटलं नव्हतं मात्र आता तसंच घडताना दिसत आहे. अमित शाह आणि नितीश कुमार यांची भेट झाली आणि 50 दिवसांत बिहारचे राजकारण बदलले… नेमकं काय घडलं?\

बिहारच्या राजकारणात मागील 50 दिवस खूप महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामुळे येथील राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे. भाजपसोबत जाणार नाही, असं म्हणणारे नितीश कुमार कोणत्याही क्षणी राजदची साथ सोडून भाजपसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बिहारमधील सत्तेत पुन्हा एकदा भाजपची घरवापसी झालेली बघायला मिळेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बिहारच्या राजकारणाचं नितीश कुमार केंद्र

राजद-जदयूचं सरकार कोणत्याही क्षणी कोसळेलं असं सांगितलं जात आहे. नितीश कुमारांची बिहारच्या राजकारणात ताकद कमी होत चाललीये. असं असलं तरी ते ज्या पक्षासोबत वा आघाडीसोबत असतात, तिला जास्त फायदा होताना दिसून आलेला आहे. त्याचं कारण म्हणजे नितीश कुमारांशी एकनिष्ठ असलेला मतदार.

अमित शाह-नितीश कुमारांची भेट

दिवस होता 10 डिसेंबर 2023. एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार हे पहिल्यांदा अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर होते. सरकारी कार्यक्रमात नितीश कुमारांनी अमित शाहांचं आनंदात स्वागत केलं. अमित शाह आणि नितीश कुमार यांच्या याचं भेटीनंतर बिहारमधील राजकारणात काही अनपेक्षित बदल दिसू लागले.

ADVERTISEMENT

29 डिसेंबर 2023 रोजी पाटण्यापासून दूर असलेल्या दिल्लीमध्ये नितीश कुमार यांनी जदयूची बैठक बोलावली. याच बैठकीत ललन सिंह यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आणि नितीश कुमार अध्यक्ष झाले. हे तेच ललन सिंह होते, जे एनडीएतून जदयू बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका करत होते.

ADVERTISEMENT

इथूनच शक्यता बळावत गेल्या की, नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याच्या. ललन सिंह यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर 16 दिवसांनी नितीश कुमारांबद्दल अमित शाहांची भूमिका बदलली. अमित शाहांनी ही भूमिका फेटाळली की नितीश कुमारांना एनडीएमध्ये जागा नाही.

एका मुलाखतीत अमित शाहांना विचारण्यात आलं होतं की, नितीश कुमार आणि इतर जे जुने मित्र तुम्हाला सोडून गेले आहेत, त्यांना पुन्हा यायचं असेल, तर दरवाजे खुले आहेत का? त्यावर शाह म्हणालेले की, “जर आणि तर राजकारण ठरत नाही. कुणाचा प्रस्ताव असेल, तर विचार केला जाईल.”

भाजपला हवे दोन उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष

नितीश कुमार आणि भाजप यांच्यात जवळपास सगळं निश्चित झालं असल्याचे सूत्रांकडून सांगितलं जात आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होताना दिसतील. पण, अशी माहिती समोर आली आहे की, भाजपने पाठिंबा देण्यास समर्थन देताना दोन गोष्टी मागितल्या आहेत. एक तर दोन उपमुख्यमंत्री भाजपचे असतील, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षही भाजपचाच असेल.

इंडिया आघाडीचे आस्ते कदम अन् भाजपने साधली संधी

विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी जदयूचे नेते नितीश कुमार यांनीच पुढाकार घेतला होता. पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. पण, इंडिया आघाडीकडून कार्यक्रम निश्चित करण्यात बराच वेळ गेला. त्यात काँग्रेसचे वाढते वचर्स्वही नितीश कुमारांच्या नाराजीचे कारण बनले.

इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चाही बरीच संथ सुरूये. त्यात नितीश कुमार यांना बाजूला केलं जात असल्याचंही दिसलं. त्यांच्या पक्षातील नेत्यांनीही ही बाब बोलून दाखवली होती. नाराज असलेल्या नितीश कुमार यांना एनडीएमध्ये आणण्याची संधी भाजपने साधली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT