‘मविआ’ने तो निर्णय घेतला! प्रकाश आंबेडकरांना दिलं पत्र
महाविकास आघाडीत वंचितला सामील करून घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांना महाविकास आघाडीच्या युतीमध्ये वंचितला समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे की नाही हे AICC किंवा रमेश चेन्निथला यांनी वंचितला माहिती दिलेली नाही.
ADVERTISEMENT

Mahavikas Meeting : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सूरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहूजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्र एक्सवर शेअऱ करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी देखील महाविकास आघाडीचे हे निमंत्रण स्विकारलं आहे. (prakash ambedkar vanchit bahujan aghadi included in mahavikas aghadi loksabha election 2024 sanjay raut nana patol uddhav thackeray)
आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर जी,@Prksh_Ambedkar @VBAforIndia pic.twitter.com/prp036Cu2S
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 30, 2024
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक आज मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये पार पडली आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर या बैठकीला उपस्थित होते.मात्र या बैठकीत त्यांनी वंचितचा अपमान झाल्याचा आरोप केला होता. या बैठकीनंतर आता नाना पटोले आणि संजय राऊत यांनी पत्र एक एक्सवर शेअऱ करून वंचित बहूजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यात आल्याची माहिती दिली.
हे ही वाचा : Manoj Jarange : 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण, रायगडाच्या पायथ्यावरून जरांगेंची गर्जना
पत्रात काय?
”देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे”, अशी आमची भूमिका आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.