Sanjay Nirupam : "संजय राऊत मुख्य सूत्रधार, त्यांना अटक करा", निरुपमांच्या आरोपाने खळबळ

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

माजी खासदार संजय निरुपम यांचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप.
संजय राऊत यांच्यावर संजय निरुपम यांनी गंभीर आरोप केले आहेत.
social share
google news

Sanjay Nirupam Sanjay Raut Khichadi scam : मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटपात घोटाळ्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत अडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sanjay Nirupam Alleged that Sanjay Raut has taken money in BMC Khichadi scam in name of his daughter, brother and partner)

माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जे उमेदवार (अमोल कीर्तीकर) आहेत, खिचडीचोर.. त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर ईडी काय करेल मला माहिती नाही, पण खिचडीचोराविरोधात निश्चितपणे कारवाई व्हायला हवी", असे निरुपम सुरूवातीला म्हणाले.

हेही वाचा >> "शिंदेंवर खूप दबाव...", तिकीट कापल्यानंतर तुमानेंनी सोडलं मौन 

संजय निरुपम पुढे म्हणाले की, "खिचडी चोर आणि खिचडी घोटाळ्यावर मी काम सुरू केलं, तेव्हा हे माहिती पडलं की, याचा मुख्य सूत्रधार दुसराच कुणीतरी आहे. खिचडी घोटाळ्याचा जे मुख्य सूत्रधार आहे, ते शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राऊतांनी मुलगी, भाऊ आणि भागीदाराच्या नावावर पैसे घेतले -निरुपम

"जेव्हा ते पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना पकडलं गेलं, तेव्हा हे आढळून आलं की, त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे लाच घेतली आहे. बिल्डरकडून पैसे घेतले. यात पत्नीला आणायला नको होतं. आता हा जो घोटाळा केला आहे, त्यात त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि त्यांचा जो भागीदार आहे, त्याच्या नावे पैसे घेतले आहेत", असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

खिचडी वाटपाचे कंत्राट मिळालेल्या कंपनीकडून घेतले 1 कोटी

"सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी आहे, ज्यात राजीव साळुंखे आणि सुजित पाटकर हे आहेत. त्या कंपनीला ६ कोटी ३७ लाख रुपयांचे खिचडी पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीकडून संजय राऊत यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्या मित्रांनी १ कोटी रुपये दलाली म्हणून घेतले", असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

संजय निरुपम यांनी काय दिली माहिती?

"वैश्य सहकारी बँकेच्या परळ पूर्व शाखेतून संजय राऊत यांनी त्यांची मुलगी विधिता संजय राऊत हिच्या नावावर चेकद्वारे लाच घेतली आहे. ती मुलगी निर्दोष आहे; तिला सह्याद्री रिफ्रेशमेंट काय आहे, हेही माहीत नसेल. पहिली लाच २९ मे २०२० रोजी घेतली आहे. ३ लाख ५० हजार या खात्यावर येतात. २६ जून २०२० मध्ये पाच लाख रुपये येतात. ७ ऑगस्ट २०२० रोजी एक लाख २५ हजार, २० ऑगस्ट २०२० रोजी तीन लाख रुपये चेकद्वारे जमा होतात", अशी माहिती निरुपम यांनी दिली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "पक्ष फोडणाऱ्यांना...", देवेंद्र फडणवीसांना पवारांचा इशारा 

पुढे ते म्हणाले की, "याच दरम्यान त्यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत त्यांच्या खात्यात ६ ऑगस्ट २०२० रोजी ५ लाख रुपये, २० ऑगस्ट रोजी १ लाख २५ हजारांचा चेक येतात. हे दोन तीन प्रकरणात तुरुंगातही गेले आहेत. सुजित मुकुंद पाटकर, हे संजय राऊतांचे अधिकृत भागीदार आहेत. त्यांच्या खात्यात १५ जुलै २०२० मध्ये १४ लाख, ५ ऑगस्ट २०२० रोजी १४ लाख, २९ ऑक्टोबर २०२० रोजी १० लाख, १७ डिसेंबर २०२० रोजी १ लाख ९० हजार आणि १२ जानेवारी २०२० रोजी पुन्हा १ लाख ९० हजार जमा झालेले आहेत."

"संजय राऊतांना अटक करा"

"माझी अशी मागणी आहे की, ईडी जी चौकशी करत आहे, त्याचे स्वरुप व्यापक करावे आणि उमेदवारासोबत (अमोल कीर्तिकर) सह्याद्री रिफ्रेशमेंटने जे घोटाळे केले आहेत, त्या घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करावी. कारण ते या घोटाळ्याचे मुख्यसूत्रधार आहेत. त्यांनी कुटुंबाच्या नावावर कमिशन खाल्लं. चोरी केली आहे", असे निरुपम यांनी म्हटले आहे.  

बघा संजय निरुपम यांची खळबळ उडवून देणारी पत्रकार परिषद

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT