Mamata Banerjee: ‘मी इंडिया आघाडीचाच भाग, पण…’

ADVERTISEMENT

Trinamool Congress to fight for Lok Sabha independence in West Bengal Chief Minister Mamata Banerjee clearly told Congress
Trinamool Congress to fight for Lok Sabha independence in West Bengal Chief Minister Mamata Banerjee clearly told Congress
social share
google news

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (All India Trinamool Congress) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी आज काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आम्ही एकट्याने निवडणूक लढवू असाच थेट इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच ममता यांनी ही घोषणा केल्याने काँग्रेससाठी (Congress) हा मोठा धक्का ठरू शकणार आहे. कारण राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या बंगालमध्ये दाखल होणार आहे, त्याआधीच ममता बॅनर्जींनी ही घोषणा केल्याने काँग्रेससाठी ही गंभीर बाब असल्याचंही बोललं जात आहे.

गणित फायद्या तोट्याचं

राहुल गांधी यांच्या कालच्या झालेल्या एका सभेत त्यांनी म्हटले होते की, माझे आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध चांगले आहेत, तर आज मात्र ममता यांनी विश्वासघात केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय, आणि त्याचा फायदा कोणाला होणार आणि त्याचा तोटा काय तेच आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काँग्रेसचा हस्तक्षेप का?

ममता बॅनर्जी यांनी याआधीच बोलताना सांगितले होते की, जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना त्यांच्या त्यांच्या भागात भाजपबरोबर लढू द्या तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र 300 जागांवर भाजपबरोबर लढू देण्याचा सल्ला दिला होता. मात्र काँग्रेसने जर आमच्यामध्ये हस्तक्षेप केला तर मात्र आम्हाला दुसरा विचार करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेसचा शिष्टाचार

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सांगितले की, मी काँग्रेसला जे काही प्रस्ताव दिले होते, ते सर्व प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले, त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकला चलो रेचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, आजपर्यंत मला बंगालमध्ये यात्रा काढणार असल्याची माहिती कोणीही दिली नव्हती. हा काँग्रेस पक्षाचा शिष्टाचार आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित करून इंडिया आघाडीचाच तो एक भाग होता असंही त्यांनी यावेळी खोचकपणे सांगितले.

हे ही वाचा >> Toilet मुळे घटस्फोटपर्यंत प्रकरण, दोन वर्ष सासरीच गेला नाही जावई!

सहभागावरून ठरणार

काँग्रेसविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता हे स्पष्ट झाले आहे की, बंगालमध्ये आता आगामी लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी त्या एकट्याच लढणार असल्याचे हे स्पष्ट झाले आहे. मात्र राहुल गांधींच्या यात्रेत मात्र त्या सहभागी होणार की नाही हे मात्र आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

ADVERTISEMENT

‘तृणमूल’शिवाय आघाडी नाही

काँग्रेसच्या संपर्क विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर बोलताना सांगितले की, ममतादीदींशिवाय इंडिया आघाडीची कल्पनाच होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यासाठी मार्ग काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इंडिया आघाडीविषयी बोलताना ममता बॅनर्जींनी म्हटले होते की, आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे, आणि हा एक दीर्घ प्रवास आहे. मात्र कधी कधी मध्ये अडथळे येतात, तर कधी हिरवा कंदीलही मिळतो. त्यामुळे तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. त्यामुळे ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची आपण कल्पना करू शकत नसल्यामुळे यातूनही काही तरी मार्ग निघेल असंही जयराम रमेश यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

भाजपचं चित्र बदललं

ममता बॅनर्जी आणि टीएमसीसोबत काही तरी तोडगा निघेल असं काँग्रेसचं मत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकला चलो रेचा निर्णय घेतला तर मात्र त्याचा नेमका फायदा कोणाला होणार आणि त्याचा तोटा कोणाला होणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमधील 42 जागांपैकी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला 22, भाजपला 18 आणि काँग्रेसला 2 व माकपला साधे तिथं खातंही खोलता आलं नव्हतं. तर 2014 चा विचार केला तर मात्र ममतांना 12 जागा कमी पडल्या होत्या, कारण त्या निवडणुकीत ममतांच्या पक्षाला 34 जागा मिळाल्या होत्या, तर नंतरच्या निवडणुकीत भाजपच्या 2 वरून थेट 18 पर्यंत जागाल वाढल्या होत्या.

हे ही वाचा >> Mamata Banerjee : ‘INDIA’ आघाडी फुटली! ममता बॅनर्जींनी सोडली साथ

    follow whatsapp

    ADVERTISEMENT