Uddhav Thackeray: 'फडणवीस निर्लज्जम सदासुखी', ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पुन्हा घणाघात
'तुम्ही मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांचे का पक्ष फोडता की, तुमच्याकडे परिपूर्ण माणसं नाहीत' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.यावेळी त्यांनी मोदींपासून अमित शाह ही माणसंही कशी शेतकरी विरोधी असल्याचे सांगत त्यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मला नाही अब्रू मी कशाला घाबरू '

'देवेंद्र फडणवीस निर्लज्जम सदासुखी'

'फडतूस म्हटले, नालायक म्हटलं कलंक म्हटलं तरी..'
Udhav Thackeray : सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा सुरु आहे. या जनसंवाद यात्रेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत फडणवीस म्हणजे, 'मला नाही अब्रू मी कशाला घाबरू 'अशी त्यांची अवस्था झाली असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
नालायक म्हटलं कलंक म्हटलं
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांना म्हणाले की, 'गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आता कोणत्या शब्दात वर्णन करायचं तेच कळत नाही. कारण त्यांना फडतूस म्हटले, नालायक म्हटलं कलंक म्हटलं तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. कारण त्यांची अवस्था म्हणजे निर्लज्जम सदासुखी अशी झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
हे ही वाचा >>'अशोक चव्हाणांना काँग्रेसनं काय कमी केलं?'
निष्ठेला किंमत नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांचा पाव मुख्यमंत्री केला तरीही ते आनंदात आहेत. नितिन गडकरी म्हणतात की, 'कारण जो निष्ठेने काम करतो, त्याला किंमत नाही हेच खरं आहे' असा संदर्भ देतही त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
दुसऱ्यांचा पक्ष फोडता
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'तुमच्या मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडता, आमची शिवसेना तुम्ही आमच्या नेत्यांना पळवता. तुमची भाजपा तुम्हाला पूर्ण वाटत नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.'