Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत युती… उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तशी चर्चा केली जात असून, त्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray-Raj Thackeray Alliance : अजित पवारांनी बंड केले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली ती राजकारणाचा उबग आल्याची. अशातच काही ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स झळकले ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचे. मधल्या काळात दोघांनी एकत्र यावे, अशी मागणी जोर धरू लागली. पण, ती चर्चा मध्येच थांबली. मात्र उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न अनुत्तरितच होता. हा प्रश्न निकाली काढलाय उद्धव ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल काय बोलले? (No Alliance with raj Thackeray said uddhav Thackeray in his latest interview)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून मागे एकदा प्रयत्न झाला होता. त्याचा उल्लेख राज ठाकरेंनी काही मुलाखतींमध्येही केलेला आहे. पण, दोन्ही भाऊ आजपर्यंत एकत्र आलेच नाहीत. आता राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची मागणी होत आहे. याचबद्दल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आणि ठाकरेंनी त्याला स्पष्ट उत्तर दिलंय.
महाराष्ट्रात पुतण्यांचं राजकारण
संजय राऊत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताना म्हणाले, ‘महाराष्ट्राचं राजकारण हे गेल्या काही काळापासून मुलांच्या भोवती नव्हे तर पुतण्यांच्या भोवती फिरताना दिसतं.’ त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोणता पक्ष त्याला अपवाद आहे?’
उद्धव ठाकरेंनी उलट प्रश्न केल्यानंतर संजय राऊत म्हणाले, ‘आणि पुतण्यांमुळे अनेक पक्ष अडचणीत आलेत असं वाटत नाही का? राष्ट्रवादीतच दोन पुतणे आहेत. मुंडय़ांचे पुतणे असतील किंवा शरद पवारांचे…’