देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा राजकीय क्षेत्रात नसते तर कुठे असते? मुख्यमंत्र्यांनी चटकन सांगितलं...

मुंबई तक

Devendra Fadanvis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात मिसळ कट्ट्यावर आज दि : 12 जानेवारी रोजी बोलत होते. तेव्हा मुलाखतकाराने त्यांना आपण तिघेही म्हणजेच आपण (देवेंद्र फडणवीस), अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे जर राजकारणात नसते तर कोणत्या क्षेत्रात असते? असा प्रश्न केला असता, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

ADVERTISEMENT

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरात मिसळ कट्ट्यावर विचारलेला 'तो' प्रश्न आणि फडणवीसांची उत्तर..

point

अजित दादा आणि एकनाथ शिंदे राजकारणात नसते तर कोण असते?

Devendra Fadanvis : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात मिसळ कट्ट्यावर आज दि : 12 जानेवारी रोजी बोलत होते. तेव्हा मुलाखतकाराने त्यांना आपण तिघेही म्हणजेच आपण (देवेंद्र फडणवीस), अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे जर राजकारणात नसते तर कोणत्या क्षेत्रात असते? असा प्रश्न केला असता, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

हे ही वाचा : खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणारा प्रकार, बीडमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत केलं लैंगिक शोषण

कोल्हापुरात मिसळ कट्ट्यावर विचारलेला 'तो' प्रश्न आणि फडणवीसांची उत्तर..

कोल्हापुरात मिसळ कट्ट्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करण्यात आला की, तुम्ही जर या राजकारणात नसता तर आपण कोणत्या क्षेत्रात असता...? त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तिघांचं क्षेत्र चटकण सांगितलं. ते म्हणाले की, 'मी जर राजकारणात नसतो तर एक चांगला वकील असतो. तसं मी आता जनतेची वकिलीच करत आहे'.

अजित दादा आणि एकनाथ शिंदे राजकारणात नसते तर कोण असते?

हे ही वाचा : नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीच्या गुप्तांगाला दुखापत, हॉस्टेलमध्ये बेशुद्घावस्थेत आढळली, कुटुंबीय म्हणाले...

अजितदादा जर राजकारणात नसते तर ते एक चांगले शेतकरी किंवा एखादे पीआय पोलीस निरीक्षक इन्स्पेक्टर झाले असते कारण ते सर्वांना दमात घ्यायची त्यांना सवय आहे, म्हणून ते इन्स्पेक्टर पोलिस असते. पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत सांगितलं असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे समाजकार्यात नक्कीच असते, एखाद्या मुलींचे किंवा कामगारांचे नेते म्हणून राहिले असते, असं ते म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp