अदाणी, सावरकर, मोदींची डिग्री; शरद पवारांच्या गुगलीने विरोधकांचाच बिघडला खेळ!

भागवत हिरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांनी काही मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेपासून स्वतःला दूर केलं, त्यामुळे चर्चेचे पेव फुटले.

ADVERTISEMENT

sharad pawar different stand raises opposition parties problems
sharad pawar different stand raises opposition parties problems
social share
google news

लोकसभा निवडणूक 2024 ला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे. असं असलं तरी काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे आणि इतर पक्ष मोदी सरकार आणि भाजपला घेरण्यासाठी व्यूहरचना करताना दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधकांची एकी महत्त्वाची आहे, असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधकांनाच अडचणीत आणताना दिसत आहे. ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी भाजपला खिंडीत गाठलं आहे, त्याच मुद्द्यांवर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेनं भाजपला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे विरोधकांनी ज्या मुद्द्यांमुळे वातावरण तापवलं, त्यावरच पवारांनी घेतलेल्या भूमिकेनं विरोधकांचा खेळ बिघडला आहे.

संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच अदाणी समूहाचा मुद्दा चर्चेत होता. राहुल गांधींनी लोकसभेत तो मांडत नरेंद्र मोदींना सवाल केले. त्याचबरोबर दुसरा मुद्दा पुढे आणला तो आम आदमी पार्टीने, तो होता नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा. तिसरा वादाचा मुद्दा ठरला सावरकर…

हेही वाचा >> सावरकरांच्या त्यागाकडे दुर्लक्ष करू शकत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी अधूनमधून सावरकरांचा उल्लेख करून भाजपवर टीका करतात. सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात पुन्हा सावरकरांना लक्ष्य केलं. लोक म्हणतात की, राहुल गांधींनी माफी मागितली असती, तर…, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि राहुल गांधी म्हणाले, ‘माझं नाव सावरकर नाही. माझं नाव गांधी आहे आणि गांधी कुणाची माफी मागत नाही.’

राहुल गांधींच्या या विधानाचे सर्वात जास्त राजकीय पडसाद उमटले ते महाराष्ट्रात. भाजप-शिवसेनेने उद्धव ठाकरेंना कात्रीत पकडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही मालेगावच्या सभेत सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, म्हणत सुनावलं. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात दरी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यात शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि अशा पद्धतीची विधान करायला नको असा सल्ला राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp