'लोकांचे बळी घेणाऱ्या धनंजय मुंडेंचं तुम्ही समर्थन करताय...', आव्हाड संतापले थेट नामदेव शास्त्रींना...

राहुल गायकवाड

Jitendra Awhad vs Namdev Shastri: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

ADVERTISEMENT

 जितेंद्र आव्हाड यांनी घेतला जोरदार आक्षेप
जितेंद्र आव्हाड यांनी घेतला जोरदार आक्षेप
social share
google news

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या सगळ्यात धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असणाऱ्या वाल्मिक कराडवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या घटनेचा मास्टरमाईंड हा कराड असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडसोबत कसे आर्थिक संबंध आहेत हे समोर आणण्याचा प्रयत्न दमानिया यांनी केला. त्याचबरोबर मुंडे यांनी कसा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा फायदा घेतला हे देखील दमानिया यांनी सांगितलं. 

या सगळ्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना मुंडेंनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्याचबरोबर गड मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं देखील जाहीर केलं. या सगळ्यामुळे आता नवीन राजकारण रंगताना दिसत आहे.

हे ही वाचा>> धनंजय मुंडेंवरचा 'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री मुंबई Tak च्या LIVE शोमधून उठून गेले!

नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड यानी एक भली मोठी पोस्ट लिहीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंडेंचं समर्थन करणं अत्यंत दुर्देवी असल्याचं आव्हाड म्हणाले, आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, 

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट जशीच्या तशी...

डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुन अश्या गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. कधीकाळी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्याचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या धंनजय मुंडे वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp