‘महाराष्ट्राच्या नशिबी नपुंसक सरकार’; उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह मोदींनाही सुनावलं

मुंबई तक

वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रोजेक्ट पाठोपाठ टाटा एअरबस प्रोजेक्टही गुजरातमध्ये होत आहे. हे प्रोजेक्ट महाराष्ट्रात येऊ घातले होते, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. यावरूनच राजकीय रणकंदन सुरू असून, आता उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून शिंदेंच्या सरकारला नपुंसक सरकार संबोधत मोदींवरही टीकास्त्र डागलंय. महाराष्ट्रातून गुजरातेत गेलेल्या प्रकल्पाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रोजेक्ट पाठोपाठ टाटा एअरबस प्रोजेक्टही गुजरातमध्ये होत आहे. हे प्रोजेक्ट महाराष्ट्रात येऊ घातले होते, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. यावरूनच राजकीय रणकंदन सुरू असून, आता उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून शिंदेंच्या सरकारला नपुंसक सरकार संबोधत मोदींवरही टीकास्त्र डागलंय.

महाराष्ट्रातून गुजरातेत गेलेल्या प्रकल्पाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.

सामना अग्रलेखात म्हटलंय की, “महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. हा प्रकल्प पेंद्राने गुजरातकडे खेचून नेला. टाटा एअरबस हा बावीस हजार कोटींचा प्रकल्प ‘किडनॅप’ करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाला आहे. महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून चार मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातेत गेले. हे प्रकल्प कर्नाटकात, आंध्रात, उत्तर प्रदेशात, बिहारात गेले नाहीत. ते मागास छत्तीसगड पिंवा झारखंड राज्यात गेले नाहीत. ते प्रकल्प ठरवून मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत व त्या ‘किडनॅपिंग’वर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत”, असं टीकास्त्र ठाकरेंनी सामना अग्रलेखातून डागलंय.

“महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी व राज्याचा स्वाभिमान, अस्मिता खतम करण्यासाठीच महाराष्ट्रात मिंधे सरकार स्थापन झाले हे आता नक्की झाले. टाटा यांनी आजपर्यंत त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिले. वेदांता फॉक्सकॉनने तर महाराष्ट्रात पायाभरणी करण्याची सर्व जय्यत तयारी केली होती, पण केसाने गळा कापावा तसे महाराष्ट्राच्या बाबतीत घडले”, असंही सामना अग्रेलखात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp