Vikram Sampath: वीर सावरकर आणि गुरूजी गोळवलकर यांच्यात टोकाचे मतभेद होते पण…
महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आली होती त्यावेळी बिरसा मुंडा यांचं कौतुक करताना राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केली. वीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि ते इंग्रजांकडून पेन्शनही घेत होते या आशयाचं वक्तव्य केलं. तसंच त्यांच्यावर टीका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचं पत्रही दाखवलं होतं. यानंतर भाजपकडून […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आली होती त्यावेळी बिरसा मुंडा यांचं कौतुक करताना राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केली. वीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि ते इंग्रजांकडून पेन्शनही घेत होते या आशयाचं वक्तव्य केलं. तसंच त्यांच्यावर टीका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचं पत्रही दाखवलं होतं. यानंतर भाजपकडून पंडित नेहरूंवर टीका सुरू झाली.
दुसरीकडे वीर सावरकरांना संघाची भूमिका मान्य नव्हती अशीही टीका झाली. या सगळ्यावर प्रकाश टाकला आहे सुप्रसिद्ध इतिहासकार विक्रम संपत यांनी. साहित्य आज तक या कार्यक्रमात मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी विक्रम संपत यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
साहिल जोशी- RSS आणि वीर सावरकर यांचे परस्पर संबंध हे कधीही चांगले नव्हते अशी टीका वारंवार होते. वीर सावरकर यांचं हे म्हणणं होतं की आपल्याला राजकीय पक्ष म्हणून पुढे आलं पाहिजे. हिंदू महासभेला RSS ने पाठिंबा द्यावा. मात्र यासाठी गुरूजी गोळवलकर कधीच तयार झाले नाहीत. ज्यावेळी पक्ष स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा गोळवकर गुरूजींनी हिंदू महासभेला निवडलं नाही तर त्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींना सोबत घेऊन जनसंघ स्थापन केला. हे कशाचं द्योतक आहे ? RSS ने वीर सावरकरांचं हिंदुत्व कधी स्वीकारलं नाही का? अनेक वर्षे वीर सावरकरांना आरएसएसने स्वीकारलं नाही आजची स्थिती अशी आहे की वीर सावरकर हे भाजपसाठी हिंदुत्वाचे आयकॉन आहेत. याबाबत काय सांगाल असं विचारण्यात आलं तेव्हा विक्रम संपत यांनी सविस्तर उत्तर दिलं.
विक्रम संपत: मला असं वाटत नाही की संघाने वीर सावरकरांना नाकारलं होतं किंवा स्वीकारलं नव्हतं. गोळवलकर गुरूजी आणि वीर सावरकर यांच्यात खूप मतभेद होते. वीर सावरकरांनी त्यांच्या खास खोचक शैलीत असं म्हटलं होतं की RSS स्वयंसेवकाची जर समाधी बांधली तर त्यावर लिहिलं जाईल की या स्वयंसेवकाने आयुष्यात काय कमावलं तर फक्त तीन गोष्टी… तो जन्मला, त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भाग घेतला आणि त्याचा मृत्यू झाला या तीनच ओळी असतील. एक प्रकारे त्यांनी ही संघाची खिल्लीच उडवली होती. त्यामुळे गुरूजी गोळवलकर आणि वीर सावरकर यांच्यात टोकाचे मतभेद होते.










