No-Confidence Motion : ‘हुकूमशहा किती घाबरट… राहुल गांधींना फक्त 4 मिनिटे दाखवलं’, काँग्रेसचा आरोप

मुंबई तक

राहुल गांधी हे लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांच्यावर केवळ 4 मिनिटं कॅमेरा होता. 11 मिनिटे फक्त लोकसभा अध्यक्षांना दाखविण्यात आलं असा आरोप काँग्रेसने केला आहे.

ADVERTISEMENT

when rahul gandhi was speaking on issue of manipur in lok sabha there was only 4 minutes of camera on him congress has alleged
when rahul gandhi was speaking on issue of manipur in lok sabha there was only 4 minutes of camera on him congress has alleged
social share
google news

Rahul Gandhi Lok Sabha: नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे तब्बल 139 दिवसांनी लोकसभेत (Loksabha) परतले. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध (PM Modi) अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत त्यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भारत जोडो, मणिपूर (Manipur) मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र हे भाषण करताना राहुल गांधी जेव्हा मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत होते तेव्हा कॅमेरा त्यांच्यावर न ठेवता अध्यक्षांवरच जास्त ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. (when rahul gandhi was speaking on issue of manipur in lok sabha there was only 4 minutes of camera on him congress has alleged)

हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? आणि यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसनी काय ट्विट केलं आहे हे सविस्तरपणे पाहूयात…

‘हुकूमशहा किती घाबरट आहे… खा. राहुलजी गांधी लोकसभेत मणिपूरवर १५ मिनिटे ४२ सेकंद बोलले. या दरम्यान @sansad_tv वर ११ मिनिटे ८ सेकंद स्पीकर ओम बिरला यांनाच दाखवले गेले. खा. राहुलजी गांधी यांना फक्त ४ मिनिटे दाखवले. हे आहे खरं..’

असं ट्वीट करत काँग्रेसने लोकसभेत विरोधकांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp