Asia Cup: पटेल, बुमराह आऊट तर मोहम्मद शमी संघाबाहेर; संघाची गोलंदाजीची कमान कोणाच्या खांद्यावर?

मुंबई तक

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) साठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. स्टार फलंदाज विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलसारखे क्रिकेटपटू 15 सदस्यीय संघात परतले आहेत. परंतु वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. जसप्रीत बुमराहची एक्झिट हा मोठा धक्का मानला जात आहे कारण तो सध्या भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर हर्षल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) साठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. स्टार फलंदाज विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलसारखे क्रिकेटपटू 15 सदस्यीय संघात परतले आहेत. परंतु वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. जसप्रीत बुमराहची एक्झिट हा मोठा धक्का मानला जात आहे कारण तो सध्या भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर हर्षल पटेल देखील दुखपतग्रस्त झाल्यामुळे त्याची निवड हुकलेली आहे.

बुमराहच्या बाहेर पडल्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चर्चेचा विषय राहिला आहे. बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी अनुपलब्ध होते, तर मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूचा संघात समावेश का करण्यात आला नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संघातील खेळाडूंची निवड पाहता भारतीय निवडकर्त्यांनी फक्त तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली ज्यात भुवनेश्वर कुमार अनुभवी आहे. मात्र, भुवीचा फिटनेस कधी फसेल हे सांगता येत नाही. आकड्यांवर नजर टाकली तर दुखापतींमुळे भुवीच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झालेला आहे. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे.

मोठ्या स्पर्धांमध्ये अनुभव हाच गुरु ठरतो

भुवनेश्वर व्यतिरिक्त अर्शदीप सिंग, आवेश खान या दोन स्पेशालिस्ट गोलंदाजांना तेवढा अनुभव नाही. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱ्यात आवेश खान चांगलाच महागात पडला होता. दुसऱ्या T20 सामन्यात, दबावाच्या परिस्थितीत आवेश शेवटच्या षटकात नो-बॉल टाकत होता आणि त्याचा फटका भारताला सहन करावा लागला. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांना आवेशच्या जागी मोहम्मद शमीला ठेवता आले असते कारण आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेत अनुभव खूप उपयोगी पडतो.

आवेश खानला संघात ठेवायचे होते तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या जागी मोहम्मद शमीची निवड करता आली असती. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल हे फिरकीपटू असताना रवी बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये का?. संघात चार फिरकीपटूंचा समावेश हाही आश्चर्यकारक निर्णय मानला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp