New Zealand विरुद्ध मालिकेत भारताचं नेतृत्व लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता

मुंबई तक

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या आगामी भारत दौऱ्यात टी-२० मालिकेसाठी सिनीअर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात लोकेश राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचे संकेत मिळत आहेत. वर्ल्ड टेस्ट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या आगामी भारत दौऱ्यात टी-२० मालिकेसाठी सिनीअर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

या दौऱ्यात लोकेश राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचे संकेत मिळत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप त्यानंतर इंग्लंड दौरा, आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकप अशा सर्व स्पर्धा लागून आल्यामुळे भारतीय खेळाडूंवर ताण आलेला आहे. सलग सहा महिने बायो बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याची कबुली जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यानंतर दिली होती. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यात बीसीसीआय संघातील सिनीअर खेळाडूंना विश्रांती देऊन लोकेश राहुलकडे नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत आहे.

“सिनीअर खेळाडूंना आता जरा विश्रांतीची गरज आहे. राहुल हा संघाचा अविभाज्य भाग आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तो टी-२० मालिकेत संघाचं नेतृत्व करण्यासाठी आघाडीवर आहे”, BCCI मधील जवळच्या सूत्राने ANI ला माहिती दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेत फॅन्सनाही मैदानात सामने पाहण्याची परवानगी मिळणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp