मी आणि शिखर संघाबाहेर बसू का? विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्याआधी रोहितं असं का म्हणाला?

मुंबई तक

रोहित शर्मा हा मैदानात ज्या पद्धतीने बॉलर्सची धुलाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीने मैदानाबाहेर तो पत्रकारांच्या प्रश्नाला मजेशीर उत्तर देण्यासाठीही ओळखला जातो. रविवारपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. दुखापतीमुळे रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी होता आलं नव्हतं. भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून ऋतुराज गायकवाड, इशान किशन हे खेळाडू चमकदार कामगिरी करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रोहित शर्मा हा मैदानात ज्या पद्धतीने बॉलर्सची धुलाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीने मैदानाबाहेर तो पत्रकारांच्या प्रश्नाला मजेशीर उत्तर देण्यासाठीही ओळखला जातो. रविवारपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.

दुखापतीमुळे रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी होता आलं नव्हतं.

भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून ऋतुराज गायकवाड, इशान किशन हे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. परंतू या खेळाडूंना अद्याप म्हणावी तशी संधी मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबद्दल प्रश्न विचारला असता रोहितने आपल्या मिष्कील स्वभावात, “तुम्हाला मी आणि शिखरने बाहेर बसायला हवंय का? भविष्यात त्यांचीही (तरुण खेळाडूंची) वेळ येईल.”

Ind vs WI : ठरलं ! ‘हा’ खेळाडू येणार रोहित शर्मासोबत सलामीला

रोहितच्या या उत्तरानंतर टीम इंडिया आपल्या सलामीच्या तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तरुण खेळाडूंना आता संघात जागा मिळते आहे आणि भविष्यात योग्य वेळ आल्यानंतर त्यांना त्यांची संधी मिळेल. परंतू त्यासाठी आता बॅटींग ऑर्डरमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाहीये.

दक्षिण आफ्रिकेत भारताला वन-डे मालिकेत ३-० ने पराभव स्विकारावा लागला होता. परंतू यासाठी सध्या संघात कोणतेही बदल करण्याची गरज नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं. वन-डे क्रिकेटमध्ये भारतीय संघ सातत्याने खेळल्याचं रोहितने सांगितलं. विंडीजसोबत भारतीय संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

रोहित पहिल्यांदाच पूर्णवेळ सांभाळणार वन-डे संघाची कमान; विराटबद्दल केलं महत्वाचं विधान, म्हणाला…

हे वाचलं का?

    follow whatsapp