रोहित पहिल्यांदाच पूर्णवेळ सांभाळणार वन-डे संघाची कमान; विराटबद्दल केलं महत्वाचं विधान, म्हणाला…

मुंबई तक

विराट कोहलीची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघामध्ये उद्यापासून नवीन अध्याय लिहीला जाणार आहे. मुंबईकर रोहित शर्माकडे पहिल्यांदाच टी-२० संघासह वन-डे संघाचं कर्णधारपद आलेलं आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहली हा भारताचा आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये विराटने भारताचं यशस्वी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विराट कोहलीची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघामध्ये उद्यापासून नवीन अध्याय लिहीला जाणार आहे. मुंबईकर रोहित शर्माकडे पहिल्यांदाच टी-२० संघासह वन-डे संघाचं कर्णधारपद आलेलं आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे.

विराट कोहली हा भारताचा आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये विराटने भारताचं यशस्वी नेतृत्वही केलं. परंतू आयसीसी विजेतेपद मिळवण्यात आलेल्या अपयशामुळे विराटला आपलं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा पहिला वन-डे सामना हा भारतासाठी ऐतिहासीक ठरणार आहे. हा सामना भारताचा १ हजारावा वन-डे सामना ठरणार आहे. त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहितने भारतीय संघाच्या तयारीमध्ये आणि विराटकडून मिळणाऱ्या नेतृत्वाबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

Ind vs WI : ठरलं ! ‘हा’ खेळाडू येणार रोहित शर्मासोबत सलामीला

हे वाचलं का?

    follow whatsapp