भारताने महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Shoaib Akhter On India Womens Team WC Final 2025 : भारताने महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारताने महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिली प्रतिक्रिया
भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या अविस्मरणीय कामगिरीचं जगभरातून कौतुक
Shoaib Akhter On India Womens Team WC Final 2025 : आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव (Ind W vs SA W) करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या या अविस्मरणीय कामगिरीचं जगभरातून कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि माजी कर्णधार रमीझ राजाने भारतीय संघाच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब अख्तर काय म्हणाला ?
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, “भारताचं मनापासून अभिनंदन! भारतीय मुलींनी अप्रतिम खेळ केला आणि त्या निश्चितच या विजयासाठी पात्र होत्या. त्यांनी देशाला आनंद साजरा करण्याची संधी दिली. टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उच्च दर्जाची होती. पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरलेला भारतीय संघ व्यापक विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, याचा मला अत्यंत आनंद आहे,” असं अख्तरने सांगितलं.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा म्हणाला, “भारताने पुन्हा सिद्ध केलं की तो जगातील सर्वात मजबूत संघांपैकी एक का आहे. भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी केली,” अशी प्रतिक्रिया रमीझ राजाने आपल्या व्हिडिओमध्ये दिली.
हेही वाचा : विश्वचषक जिंकला, आता स्मृती मंदानाच्या लग्नाचा बार उडणार, सांगलीत पार पडणार विवाह सोहळा










