Virat Kohli LBW: कोहलीच्या विकेटवरून वाद, टीम इंडिया भडकली, काय घडलं?

मुंबई तक

ind vs aus 2nd test Updates, virat kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (Second Test) सामन्यात मोठा वाद झाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ज्या पद्धतीने बाद असल्याचा निर्णय देण्यात आला, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केवळ चाहतेच नाही तर खुद्द विराट कोहली आणि टीम इंडियाचे व्यवस्थापनही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ind vs aus 2nd test Updates, virat kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (Second Test) सामन्यात मोठा वाद झाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ज्या पद्धतीने बाद असल्याचा निर्णय देण्यात आला, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केवळ चाहतेच नाही तर खुद्द विराट कोहली आणि टीम इंडियाचे व्यवस्थापनही या बाद देण्याच्या निर्णयावरून निराश झाले. (IND vs AUS: Controversy over Virat Kohli’s lbw dismissal)

50व्या षटकात मॅथ्यू कुनहेमनने विराट कोहलीला चेंडू टाकला, तेव्हा तो चेंडू पॅडला लागला. अपील केल्यानंतर अंपायरने विराट कोहलीला बाद असल्याचा निर्णय दिला. नंतर विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्येही विकेटवर चेंडू थेट पॅडवर लागल्याचं स्पष्ट दिसत नव्हतं, मात्र अंपायरने विराट बाद असल्याचा निर्णय दिला आणि त्याला मैदान सोडावं लागलं.

थंर्ड अंपायरने पंचाने विराट कोहलीला आऊट दिल्यावर तो संतापला आणि आक्षेप घेत पॅव्हेलियनमध्ये परतला. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या टीम इंडियाचे व्यवस्थापनही या निर्णयावर नाखूश झाले. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर खूश नव्हते.

हे वाचलं का?

    follow whatsapp