Ind vs Aus Final : टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण
Ind vs Aus Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 ची फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आहे. येथे नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT

Ind vs Aus Final, Pat Cummins Statement : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात नाणेफेक ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात पडली. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याच्या या निर्णयाचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. कारण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी संथ असल्याने त्याचा निर्णय चकित करणारा होता. याचा फायदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना मिळेल. पण, ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचं कारण पॅट कमिन्सने सांगितले.
दुसरीकडे नाणेफेक जिंकली असती, तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले नाणेफेक झाल्यानंतर सांगितलं. आता कमिन्सची बाजी योग्य ठरणार की उलटफेर होणार हे पाहावे लागेल.
ऑस्ट्रेलियाने का घेतली प्रथम गोलंदाजी?
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्स म्हणाला, ‘ही खेळपट्टी कोरडी दिसत आहे आणि आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. दव हे एक कारण आहे आणि रात्री येथे भरपूर दव असते. नंतर फलंदाजी करणे सोपे होईल.”
हे ही वाचा >> World Cup 2023 : स्टंप कॅमेरा ते ड्रोनची दृश्य! एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये किती असतात कॅमेरे?
भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, “मला प्रथम फलंदाजी करायला आवडले असते. चांगली खेळपट्टी दिसते. जर तो मोठा सामना असेल, तर जास्त धावा लावायला आवडेल.”