ठाणे: भारतीय हवामान खात्याने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी आज (16 जून) दुपारी पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मुंबई, रायगड आणि पालघर यांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. कारण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ठाण्यात येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हवामान खात्याचा अंदाज:
IMD ने ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील 3-4 तासांत 200 मिमी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मते, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Low-Pressure Area) आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकण किनारपट्टीसह ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा जोर अधिक वाढू शकतो.
हे ही वाचा>> Mumbai Rain: मागील 2 तासांपासून मुंबईत सुरूय धडकी भरवणारा तुफान पाऊस, पाहा कुठे-कुठे पाणी भरलं?
ठाण्यातील सध्याची परिस्थिती:
पाणी साचणे: ठाण्यातील कळवा, मुंब्रा, डोंबिवली, आणि कल्याण यासारख्या खाडी किनारी असलेल्या शहरांमध्ये पाणी साचण्याच्या भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर 1-2 फूट पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
वाहतूक: ठाण्यातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
नागरिकांचे हाल: पाणी साचलेल्या रस्त्यांमुळे पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाण्यातील बाजारपेठा आणि रहिवासी भागातही पाणी शिरल्याने स्थानिकांचे हाल झाले आहेत.
हे ही वाचा>> पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांचा जीव मुठीत, नेमकं घडलं काय?
प्रशासनाचे उपाय:
ठाणे महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क आहे.
पंपिंग स्टेशन: ठाण्यातील पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे.
पावसाचा इतर भागांवर परिणाम:
ठाण्यासह मुंबई, रायगड, आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पालघरमध्येही तीव्र पावसामुळे वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. यंदाच्या मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकणातील शेतीच्या कामांना खीळ बसली आहे.
ठाण्यात सध्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील 3 तासांत रेड अलर्टमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. हवामान खाते आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
ADVERTISEMENT
