Jitendra Awhad : “शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, भुजबळ सुपारी घेतलेला पोपट”

भागवत हिरेकर

02 Jan 2024 (अपडेटेड: 02 Jan 2024, 03:57 AM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अमोल कोल्हेंना दिलेल्या मुलाखतीत आव्हाड काय म्हणालेत… वाचा

Mumbaitak
follow google news

Jitendra Awhad To the Point Sharad pawar Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर तोफ डागली. आव्हाड यांनी खासदार अमोल कोल्हेंनी घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य करताना छगन भुजबळांना सुपारी घेतलेला पोपट म्हटले आहे. त्याचबरोबर अजित पवारांनाही आव्हाडांनी नव्याने आव्हान दिले आहे.

हे वाचलं का?

खासदार अमोल कोल्हे यांच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड बोलले आहेत. या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आव्हाडांनी मुलाखतीत केलेल्या महत्त्वाच्या विधानांचा समावेश आहे.

हेही वाचा >> प्रकाश आंबेडकरांचा नवा प्रस्ताव, उद्धव ठाकरे ठाकरे कात्रीत! उरले फक्त दोनच पर्याय

“बाहेरच्यांनी द्रोह केला, तर तो द्रोह निपटून टाकता येतो. घरातल्या द्रोहाला करायचं काय?”, जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाने व्हिडीओची सुरू होते.. त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाजपसोबत तडजोडी करण्याच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणताहेत की,”ज्यांनी साहेबांचं (शरद पवार) राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी निगोशिएशन (चर्चा) होऊच शकत नाही.”

शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, आव्हाड नेमकं काय बोलले?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवारांनाही वेदना होतात, असं सांगताना आव्हाडांनी पाण्यात रडणाऱ्या माशाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “दिल्लीला ज्यावेळी ते एकटे बसत असतील, तुम्हाला काय वाटतं हे हे विचार त्यांना सतावत नसतील. मी काय चुकलो, कुठे चुकलो, मी यांना काय कमी केले? पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसतच नाही कुणाला. साहेबांच्या (शरद पवार) चेहऱ्यावर दुःख नाही म्हणजे त्यांना होत नाही असं वाटतं का? ते बोलून दाखवत नाही म्हणून त्यांना दुःख होत नाही, असं वाटत का?”, असं आव्हाड म्हणाले आहेत.

अजित पवारांना चॅलेंज

बंड केल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष नावावर आणि घड्याळ या चिन्हावर दावा केला आहे. त्यावरून आव्हाडांनी चॅलेंज दिलं. ते म्हणाले आहेत की, “तुमचं कर्तृत्व इतकं महान आहे, तुम्हाला वाटतं. अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे असं तुम्ही म्हणता ना, मग घ्या ना स्वतंत्र निशाणी. घ्या ना स्वतंत्र पक्षाचं नाव आणि जा जनतेसमोर. जनता जनार्दन ठरवेल ना काय करायचं?”

हेही वाचा >> ‘शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना पैसै देण्यास भाग पाडले’, फर्नांडिसांना का द्यावे लागले साडे आठ कोटी?

पुढे आव्हाड म्हणतात, की, “ज्या घराने तुम्हाला सहा पदे दिली, ऐश्वर्य दिलं. नाव दिलं, सन्मान दिला, त्या घराला पाडताना… त्याच्यावर हातोडा मारताना तुम्हाला काही वाटत नाही. तुमच्याकडून काय अपेक्षा बाळागायच्या?”, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवारांच्या बंडाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा >> “भावी खासदार पोस्टर लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम”, फडणवीसांचा इशारा

“बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, भ्रष्टाचार, गोंधळलेलं सरकार… या सगळ्या गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर भुजबळांना ही सुपारी दिलीये. भुजबळ बोलत नाहीयेत. भुजबळ पोपट झाले आहेत”, असे म्हणत आव्हाडांनी भुजबळांनाही सुनावलं आहे.

    follow whatsapp