मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या नाही, तर... हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

Maharashtra Politics : मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या नाही, तर... हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

maharashtra politics

maharashtra politics

मुंबई तक

02 Dec 2025 (अपडेटेड: 02 Dec 2025, 12:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या होणार नाही

point

नागपूर हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

Maharashtra Politics : मुंबई: राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) मतदान सुरू आहे. मात्र, या निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाने सर्वात मोठा निर्णय दिलाय. हायकोर्टाने उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली आहे. आता मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे तुमचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण होणार? हे 21 डिसेंबर रोजी समजणार आहे.

हे वाचलं का?

आज ज्या ठिकाणी मतदान सुरु आहे, त्याठिकाणची मतमोजणी उद्या होऊ शकणार नाही, असं नागूपर खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे. उद्या मतमोजणी झाल्यास त्याच्या पारदर्शकतेवर परिणाम होऊ शकतो, असं न्यायालयाने नमूद केलंय. सध्या जे मतदान सुरु आहे, ते सुरु राहुद्या. मात्र, त्याचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करा, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. तसं झाली नाही तर 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, याबाबतचा सर्व युक्तिवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO

न्यायालयाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. मला मतदान पद्धती काही योग्य वाटत नाही. चूक नसताना उमेदवारांचा भ्रमनिरास होतोय.

निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधार आणावा. पुढच्या निवडणुकांमध्ये असं होवू नये, हे निवडणूक आयोगाने पाहावं, अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका पुढे नेणं कुठल्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. माझी पर्सनल नाराजी कायदेशीर मुद्द्यांवर आहे. प्रक्रिया कायदेशीररित्या होत नाही म्हणून माझी नाराजी आहे. केवळ 24 ठिकाणच्या निवडणुकांसाठी सगळी मतमोजणी पुढे करणं योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोकणात सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बस 20 फुट खाली कोसळली, बसचा अक्षरश: चुराडा; चौघांची प्रकृती गंभीर

    follow whatsapp