'शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास...', अखेर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; मार्कर पेनबाबतही भाष्य

Maharashtra state election commission : बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.

Election Commission

Election Commission

मुंबई तक

15 Jan 2026 (अपडेटेड: 15 Jan 2026, 03:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास...', अखेर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण;

point

मार्कर पेनबाबतही भाष्य, गैरकृत्य करणाऱ्यास निर्वाणीचा इशारा

State election commission Maharashtra: बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

हे वाचलं का?

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत, असं आयोगाकडून सांगण्यात आलंय. 

हेही वाचा : मतदानासाठी वापरलेली शाई पुसली जातेय, 'मुंबई Tak'चा फॅक्ट चेक; निवडणूक आयोगाने याबाबत काय म्हटलं होतं? VIDEO

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.  

मुंबई महापालिकेकडूनही स्पष्टीकरण 

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. तसेच,महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही वृत्तात सांगितले जात आहे.  याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याबाबत माननीय महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे, माध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

केंद्रावर जाण्यापूर्वीचं महिलेच्या नावाचं मतदान झालं, दबाव टाकताच पोस्टल करुन घेतलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

    follow whatsapp