Mumbai Tak Baithak 2025 NCP SP state president Shashikant Shinde and MP Nilesh Lanke: मुंबई: मुंबई Tak बैठकमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार निलेश लंके आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील सुरू असणाऱ्या राजकारणावर भाष्य केलं. तसंच राजकारणातील पुढील वाटचाल यावर देखील दोन्ही नेत्यांनी त्यांची मतं मांडली. दरम्यान, यावेळी निलेश लंके यांनी मोदी सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. निलेश लंके यांनी केंद्रात असणाऱ्या सरकारची थेट हिटलरशी तुलना केली आहे. दुसरीकडे त्यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT
'देशाने अनेक हिटलर पाहिले पण हिटलरचा कालखंड हा काही काळच होता. आज जी हुकुमशाही सुरू आहे, ती वाईटच आहे.' असं म्हणत निलेश लंके यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
पाहा निलेश लंके आणि शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले:
प्रश्न: हिंदुत्वाबाबत नेमकं काय म्हणणं आहे?
निलेश लंके : मुंबई असो वा दिल्ली पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडली पाहिजे. जो गराडा मुंबईत होता तोच गराडा दिल्लीत जमा करण्याची ताकद निर्माण केली. राज्यानुसार भाषा बोलली पाहिजे. हिंदुत्वाबाबत बोलायचं झालं तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व मान्य आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जातींमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. परदेशातील लोक हे विकासावर बोलत असतात. पण हे लोक आपल्या जातीपातीवर बोलत आहेत.
हे ही वाचा>> Balasaheb Thorat Mumbai Tak Baithak 2025: "महायुद्ध जिंकल्यावर चर्चिलचं सुद्धा..", बाळासाहेब थोरात विधानसभेच्या पराभवावर खुलेपणाने बोलले!
प्रश्न: देशाचे हिटलर असं तुम्ही कोणाला उद्देशून बोलत होता?
निलेश लंके: देशाने अनेक हिटलर पाहिले पण हिटलरचा कालखंड हा काही काळच होता. आज जी हुकुमशाही सुरू आहे, ती वाईटच आहे. पूर्वी ईडी हा प्रकार कोणाला माहिती नव्हता. आता शेतातल्या शेतकऱ्याला विचारलं तर त्यालाही कळतं की नेते इकडे तिकडे गेले तर ईडी लावली वाटतं. या देशात अनेक सरकार झाले पण एवढ्या चुकीच्या पद्धतीने राहिले नाहीत.
प्रश्न: तुम्हाला विधानसभेला ऑफर आली होती का?
शशिकांत शिंदे: हो बऱ्याच ऑफर आलेल्या होत्या, सर्वांनाच ऑफर आलेल्या होत्या पण आम्ही निष्ठावंत आहोत आणि आम्ही कुठेही गेलेलो नाही.
हे ही वाचा>> Sana Malik, Sneha Dube Mumbai Tak Baithak 2025: 'अजितदादांनी सांगितलंय, अजिबात सेक्युलर विचार सोडणार नाही', सना मलिक स्पष्टच बोलल्या!
प्रश्न: लाडक्या बहिणीच्या योजनेबाबत काय सांगाल?
शशिकांत शिंदे: लोकसभेला यश मिळाल्यानंतर ते विधानसभेवेळी सावध झाले. लाडक्या बहिणीमुळे बऱ्यापैकी परिणाम झाला. जाती-धर्मात तर तेढ निर्माण झालाच. हे सर्व काही लोकशाहीच्या दृष्टीकोनातून घातक आहे. आता तर लोकांच्या घरात पैशांच्या बॅगाही दिसू लागल्या आहेत, याचा विपरीत परिणाम होत आहे. विरोधी पक्षातील लोकांना पैसे द्यायचे नाही. ही एक हुकुमशाही आहे, यांना रेटून काम न्यायचं आहे. सत्तेची मस्ती जोवर जनता उतरवत नाहीत तोवर काही होणार नाही.
दरम्यान, लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आणि दारूची दुकानं वाढवायची. आपला महाराष्ट्र साधू आणि संतांचा होता आणि आपल्या राज्याची अशी स्थिती केली आहे, अशी टीका शशिकांत शिंदे यांनीही केली.
ADVERTISEMENT
