Nishikant Dubey on Sanjay Raut : मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचा पराभव करत महायुतीने विजयाचा ध्वज फडकावला आहे. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका बाजूला भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि अस्मितेसाठी लढत राहणार असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी पराभवासाठी एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलं आहे. एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जयचंदची उपमा दिली. यावरुन भाजपचे खासदार निशिकांत दुबे संतापले आहेत. यामुळे राऊत आणि दुबे असा वाद रंगल्याचं पहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, नगरसेवकांचा पुढील 3 दिवसांचा मुक्काम ठरला!
निशिकांत दुबे म्हणतात, संजय राऊत नारदमुनी
संजय राऊत यांनी मुंबई मनपामधील ठाकरे बंधूंच्या पराभवाला एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलं आहे. एकनाथ शिंदेंना मराठी जनता जयचंदच्या रुपात लक्षात ठेवेल असं राऊत म्हणाले. तसेच जर एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली नसती तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता असंही ते म्हणाले. यावरुन भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद रंगला आहे. एक्सवर पोस्ट करत दुबेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. एक्सवर पोस्ट करत दुबेंनी राऊत हे नारदमुनी आणि मंथराचे एकत्रित रुप असल्याचे म्हटले आहे.
जर शिंदे जयचंद झाले नसते तर..
संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील ठाकरेंच्या पराभवाला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचे सांगितले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राऊत यांनी शिंदेंना जयचंद असं संबोधलं आहे. जयचंद हा बाराव्या शतकातील एक ताकदवान राजा होता. काही कारणांमुळे इतिहासात या राजाची गद्दार अशी नोंद झाली आहे. यावरुनच राऊतांनी शिंदेंवर टीका केली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राऊत म्हणाले की, 'जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले नसते तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता. मराठी जनता शिंदेंना जयचंद म्हणूनच लक्षात ठेवेल. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये राऊतांनी फडणवीस आणि शिंदेंना टॅगही केलं आहे.
हे ही वाचा : ठाकरेंच्या उमेदवारासाठी रवीना टंडनचा प्रचार, पण 'त्या' वार्डात निकाल काय आला? अभिनेत्री परदेशात गेल्याने चर्चेला उधाण
महापौर कोण होणार?
मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांचे निकाल मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर झाले. भाजपने ८९ जागा जिंकल्या, तर त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने २९ जागा जिंकल्या.शिवसेनेने (यूबीटी) ६५ जागा जिंकल्या आणि मनसेने सहा जागा जिंकल्या. तर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसने २४ जागा जिंकल्या. एआयएमआयएमने आठ, राष्ट्रवादीने तीन,समाजवादी पक्षाने दोन आणि राष्ट्रवादीने (सपा) फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. निकालानंतर मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा आता रंगली आहे. एकनाथ शिंदेंनी महापौर महायुतीचाच होणार असं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT











