'ही कसली पद्धत? व्हिडीओ शूटींग करा रे...',शिरुरच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्राबाहेर बाचाबाची VIDEO

Shirur Nagarpalika election : शिरुरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्रात जाण्याच्या मुद्यावरुन मोठा वाद झालाय

Shirur Nagarpalika election

Shirur Nagarpalika election

मुंबई तक

03 Dec 2025 (अपडेटेड: 03 Dec 2025, 10:33 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिरुरच्या आजी-आमदारांमध्ये मतदान केंद्रावर शा‍ब्दिक बाचाबाची

point

हायहोल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ

Shirur Nagarpalika election : नगरपालिका निवडणुकीच्या मतदान सुरु असताना शहरात राजकारण चांगलंचं तापलेलं पाहायला मिळालं. शहरातील आडत बाजार येथील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर आजी व माजी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. शिरुरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्रात जाण्याच्या मुद्यावरुन मोठा वाद झालाय. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

हे वाचलं का?

आमदार कटके हे मतदारांची गर्दी, मतदानाची गतीमानता तसेच एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत होते. त्याच क्रमाने ते उर्दू शाळेतील मतदान केंद्रात आले. त्यांच्या भेटीची माहिती मिळताच माजी आमदार अशोक पवार यांनी तात्काळ त्या केंद्राकडे धाव घेतली. त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : मुंबईची खबर: मुंबईच्या 'या' शहरातील 9 मेट्रो प्रोजेक्ट्सबाबत सरकारचं मोठं पाऊल! व्याजमुक्त कर्ज अन्...

आमदार कटके मतदान केंद्रातून बाहेर पडताच पवार यांनी त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांना सरळ जाब विचारला. मतदान चालू असताना आपण वारंवार मतदान केंद्रांमध्ये का जात आहात? असा सवाल अशोक पवार यांनी सार्वजनिकरीत्या केला. यावर कटके यांनीही प्रत्युत्तर देत आपण फक्त परिस्थितीची पाहणी केली असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. यावरून दोघांमध्ये काही काळ जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही क्षणांसाठी वातावरण हाताबाहेर जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.

वाद वाढू नये म्हणून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मागे हटण्याचे निर्देश दिले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर आजी–माजी आमदारांनीही मोठा विवाद न वाढवता तेथून निघण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये काही काळ चर्चा रंगली. मतदान शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून आरोप–प्रत्यारोपांची मालिका मात्र सुरू झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pannalal Surana : जनतेने नाकारले म्हणून मंत्रिपद नाकारणारा नेता काळाच्या पडद्याआड, पन्नालाल सुराणा यांचे निधन

    follow whatsapp