मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा, अटक वॉरंट रद्द
स्वाती चिखलीकर, सांगली: सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये १४ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजात मनसेचे अध्यक्ष निकाल इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. यामुळे, शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. २००८ साली भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन केलं होतं. […]
ADVERTISEMENT

स्वाती चिखलीकर, सांगली: सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये १४ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजात मनसेचे अध्यक्ष निकाल इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. यामुळे, शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत.
२००८ साली भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन केलं होतं. याबद्दल कल्याणमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर मनसेकडून ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती.
सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडणे आणि आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिरीष पारकर, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांच्या वर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांतता भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज ठाकरे म्हणाले, ‘मनसैनिकांच्या काळजीपोटी अयोध्या दौरा रद्द केला; शिव्याही खायल्या तयार..’