Security Breach in Lok Sabha : लातूरचा अमोल ते गुरुग्रामचा विशाल, 6 जणांनी कसा रचला कट?
lok sabha security breach News in marathi : 13 डिसेंबर रोजी लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. दोघांनी लोकसभेत गोंधळ घातला. याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

Security Breach in Lok Sabha : संसदेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेची सुरक्षा भंग करण्याचा कट 6 जणांनी रचला होता. कट रचणाऱ्या सहा जणांपैकी पाच जणांना पोलिसांनी पकडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरच्या अमोल शिंदेसह सहाही आरोपी चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत घुसखोरी करण्याचा कट रचला होता. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते आणि बुधवारी संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.
लोकसभेत काय झाले?
बुधवारी (13 डिसेंबर) लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या होत्या. हे दोघेही लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने बाकांवरून धावत सुटले. त्यानंतर एका तरुणाने त्याच्या बुटातून पिवळा गॅस काढला आणि फवारला. यावेळी संसदेत गदारोळ झाला. खासदारांची धावपळ सुरू झाली. मात्र, काही खासदारांनी त्यांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा >> अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्रातील ‘हा’ वकील धावला, कोर्टात लढवणार बाजू
लोकसभेच्या आत दोन तरुणांनी उडी मारली, तेव्हा संसदेबाहेर निदर्शने करणाऱ्या लातुरच्या अमोल शिंदे आणि नीलम सिंह या तरुणीला पोलिसांनी अटक केली. दोघेही रंगीत गॅस फवारत होते आणि घोषणा देत होते.