Maharashtra : तसं बोलून फसले! अब्दूल सत्तारांची विकेट जाणार? ‘तो’ पीए कोण?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादात सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सत्तार स्वतः बोलून फसले आहेत. एकनाथ शिंदेंच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच स्विय सहायक दीपक गवळीचा वाद समोर आला आहे.
ADVERTISEMENT

-धनंजय साबळे
Abdul Sattar in Trouble : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादात सापडलेत. स्वतःच बोलून फसलेत. एकनाथ शिंदेंच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच हा वाद समोर आलाय. त्यामुळे विस्तारात कोणाचा नंबर लागण्याआधीच सत्तारांची विकेट जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. आणि हे सगळं एका पीएमुळे घडलंय. नेमकं प्रकरण काय आणि त्यामुळे सत्तारांचं मंत्रिपद कसं धोक्यात आलंय, हेच आपण बघणार आहोत. (Maharashtra Political News)
सरकार ठाकरेंचं असो की शिंदेंचं अब्दुल सत्तार मात्र नेहमीच वादात राहिलेत. एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराआधी सत्तारांचं कनेक्शन थेट टीईटी घोटाळ्याशी जोडण्यात आलं. सत्तारांच्या मुलींचीही नावं या घोटाळ्यात असल्याचे आरोप अगदी विस्ताराच्या आदल्या दिवशी झाले. पण या सगळ्या आरोपांवर कडी करत ठाकरे सरकारमध्ये निव्वळ राज्यमंत्री असलेले सत्तार शिंदे सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री झाले. प्रमोशन झालं!
हेही वाचा >> Mallikarjun Reddy : फडणवीसांसमोरच शिंदेंच्या आमदारावर टीकास्त्र, काय घडलं?
कृषी खात्यासारखं राज्यभर प्रभाव, व्याप्ती असलेलं खातं मिळालं. नवं खातं मिळालं असलं, तरी सत्तार जुन्याच कारभाराने वादात सापडले. गेल्या हिवाळी अधिवेशनात सत्तारांवर गायरान जमीन प्रकरणात खळबळजनक आरोप झाले. ३७ एकर गायरान जमिनीत मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचे आरोप झाले. त्याचवेळी सिल्लोड महोत्सवात कृषी अधिकाऱ्यांना वसुलीचं काम लावल्याचे आरोपही सत्तारांवर झाले. याच आरोपांमुळे सत्तारांचं मंत्रिपद औटघटकेचं ठरेल, असं म्हटलं गेलं. विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली. पण सत्तार डंके की चौटपे मंत्रिपदी कायम राहिले.