"मनगटात काळ्या पट्ट्याचं घड्याळ घातलेल्या हातानं नमस्कार करत...", अजितदादांच्या जाण्याने अभिनेत्री हेमांगी कवी भावूक

मुंबई तक

Ajit Pawar death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर अजित पवार यांच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. तुमचं आडनाव कवी मग तुम्ही कविता बिविता करता का? असा प्रश्न हेमांगी कवी यांना विचारण्यात आला होता. तसेच अजित पवार यांच्या घडाळ्याची देखील आठवण करून दिली.

ADVERTISEMENT

Ajit Pawar death
Ajit Pawar death
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हेमांगी कविची पोस्ट जशीच्या तशी 

point

'शरद पवारांसारखीच त्यांची मेमरी शार्प'

Ajit Pawar death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर अजित पवार यांच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. तुमचं आडनाव कवी मग तुम्ही कविता बिविता करता का? असा प्रश्न हेमांगी कवी यांना विचारण्यात आला होता. नंतर हेमांगी कवी यांनी अजित पवार यांना नाही असं उत्तर दिलं. तसेच हेमांगी कविने अजित पवार यांच्या हातातील घडाळ्याच्या आठवण देखील सांगितली, तसेच तिची भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा :  Ajit Pawar: पवार कुटुंबियांनी घेतलं अजितदादांचं शेवटचं दर्शन, राजकीय नेत्यांची उपस्थिती...

हेमांगी कविची भावनिक पोस्ट  

काल सकाळी मी नेहमीप्रमाणे shooting ला गेले. Make up करून, तयार होऊन script वाचनाला आम्ही सगळे जमलो. Scene वाचायला सुरवात करणार तेवढ्यात आमच्या दिग्दर्शक जयंत पवारांच्या फोन वाजला. त्यांच्या आईंचा फोन होता. आमचे दिग्दर्शक म्हणाले “मी breakfast केला का विचारायला फोन केला असेल हां आता आईने” आणि हसत हसत आमच्यासमोरच call घेतला. ते हॅलो बोलणार इतक्यात ते म्हणाले “काय!!!?”आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिथून त्यांनी काय ऐकलं आम्हांला काहीच कळेना. अगदी थोड्या वेळात त्यांनी फोन ठेवला आणि आम्हांला सांगितलं, “अजित पवार गेले”. आम्ही गोंधळून सगळ्यांनी एकदम विचारलं, “काय, कोण गेलं?”. तर ते हताशपणे म्हणाले “अजितदादा पवार”. हे ऐकल्यावर आम्हांला जो धक्का बसला तो मी इथं शब्दात सांगूच शकत नाही. आम्ही पटापट आमचे आमचे फोन उघडून social media पाहू लागलो कारण आम्ही जे ऐकलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. वाटत होतं काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा काहीतरी नावाचा गोंधळ झाला असेल? Fake news असेल पण सगळ्या समाज माध्यमावर अजितदादांच्या मृत्यूच्या बातम्या दिसू लागल्या होत्या. 

धक्कादायक म्हणजे काय हे काल पुन्हा प्रकर्षाने जाणवलं. आणि ज्याप्रकारे मृत्यू झालाय ते तर आणखी भीषण आहे. आज हे सगळं लिहिताना सुद्धा मला नीट प्रोसेस झालेलं नाहीये. 


 

'10 वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले...'

10 वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजितदादांसोबत इतरही नेते सुद्धा आले होते. कार्यक्रम संपता संपता आम्हां कलाकारांना ग्रुपसाठी स्टेजवर बोलवलं. कार्यक्रम शासकीय असल्यामुळे सगळे प्रोटोकॉल सांभाळून फोटो काढले जात होते पण स्टेजवर ही गर्दी झाली. ग्रुप फोटोमध्ये सगळे नीट मावावेत म्हणून आम्ही सगळे कलाकार फोटोसाठी रांगेत पुढे उभे राहीलो, आमच्या मागे VIPs. तेवढ्यात मागून आवाज आला “काय कवी” मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर माझ्या अगदी मागे दादा उभे होते. मी दचकून म्हणाले “सर तुम्ही?” मला त्यांना विचारयचं होतं “तुम्हांला माझं नाव कसं माहीत?” हे विचारणार तेवढ्यात दादाच म्हणाले “अडनाव कवी आहे तर काय कविता बविता करता की नाही?” मी हसून नाही म्हटलं. “मी फक्त नावाची कवी आहे”. त्यावर त्यांनी विचारलं “आडनाव कवी कसं काय” मग मी थोडक्यात त्यांना सांगितलं. बरं समोर फोटो काढणं सुरुच होतं. मग मागून कुणीतरी म्हटलं “तुम्ही पुण्याच्या का?” मी ‘नाही’ बोलणार इतक्यात दादाच म्हणाले… “अरे त्या ‘माण’ तालुक्याच्या आहेत…जयकुमार गोरेच्या गावच्या!” हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर यायची बाकी होती. मी फोटो वगैरे सोडून अजितदादांकडे बघत राहिले. तर ते त्यांची छानशी स्माईल देत सगळ्यांसोबत फोटो काढत होते. फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला आणि ते आम्हां सगळ्यांना त्यांच्या विशेष स्टाईलमध्ये डाव्या मनगटात काळ्या पट्ट्याचं घड्याळ घातलेल्या हातानं नमस्कार करत ‘चला’ म्हणत तरतरतर निघून गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp