Odisha Train Accident: स्वस्त झालंय मरण, एका झटक्यात 280 जण ठार; नेमका कसा झाला अपघात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

coromondel express goods train howrah express triple train accident odisha 280 deaths 900 injured
coromondel express goods train howrah express triple train accident odisha 280 deaths 900 injured
social share
google news

Marathi Latest News: बालासोर (ओडिशा): ओडिशातील (Odisha) बालासोर येथील बहनगा बाजार स्टेशनजवळ घडलेला अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे. अपघाताचे वृत्त शुक्रवारी रात्री टप्प्याने-टप्प्याने समोर आलं. सुरुवातीला कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromondel Expres) आणि मालगाडी (Goods Train) यांच्यात धडक झाल्याचं वृत्त समोर आलेलं. यानंतर हावडा एक्स्प्रेसच्या (Howrah Express) धडकेचीही बातमी आली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तीन गाड्यांमध्ये धडक झाल्याचे स्पष्ट झालं. या अपघाताचे आतापर्यंत जे फोटो समोर आले आहेत, ते अत्यंत भयावह आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा हा 30, नंतर 50, नंतर ७० असा वाढत होता. मात्र, आता मृतांचा आकडा हा 280 देखील (280 Death)पुढे गेला आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता किती आहे याचा आपल्याला अंदाज लावता येईल. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ही माहिती दिली. (coromondel express goods train howrah express triple train accident odisha 280 deaths 900 injured)

लष्कराकडून मदत कार्य सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर जो रेल्वे डब्ब्यांचा जो ढिगारा झाला त्यात अजूनही अनेक मृतदेह असल्याचं समजतं आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक एसी डबे हे बाजूच्या रुळावर उलटले होते त्यामुळे त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. डब्ब्यांमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागत आहे. बचावकार्यात लष्करानेही मदतीचा हात पुढे केला आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केला एक दिवसाचा राजकीय दुखवटा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी रेल्वे अपघाताबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार 3 जून रोजी राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण साजरा केला जाणार नाही. ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशी होती अपघाताची परिस्थिती

अपघाताबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक 12841 (कोरोमंडल एक्स्प्रेस) चे डबे B2 ते B9 चे डबे घसरले. त्याचवेळी A1-A2 चे डबेही रुळावरून घसरले. तर कोच B1 तसेच इंजिन रुळावरून घसरले आणि शेवटी H1 आणि GS कोच हे रुळावरच राहिले. म्हणजेच, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या जास्त असू शकते आणि एसी बोगीमध्ये बसलेल्या लोकांची जीवितहानी अधिक होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

या अधिकाऱ्याकडे अपघाताचा तपास

तर ट्रेन क्र. 12864 (बंगलोर-हावडा मेल) च्या एका GS कोचचे नुकसान झाले. यासोबतच मागील बाजूचा जीएस कोच आणि दोन बोगी रुळावरून घसरून उलटल्या. तर कोच ए 1 ते इंजिनपर्यंतची बोगी रुळावरच राहिली. या रेल्वे अपघाताचा तपास ए.एम. चौधरी (CRS/SE सर्कल) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मुंबई Tak चावडी: ‘शिवसेनेशी युतीचा निर्णय ही भाजपची चूकच’, विनोद तावडेंचा गौप्यस्फोट

मृतांचा आकडा शेकडोंच्या घरात

पहाटे 3.30 वाजता बचावकार्य सुरू होते तोपर्यंत एनडीआरएफच्या जवानांनी अनेक मृतदेह बाहेर काढले होते. ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी टीम गॅस कटरचा वापर करत आहे. त्याचवेळी मंत्री मनश भुईंया यांच्या नेतृत्वाखाली बंगाल सरकारचे पथक घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे, कटकचे डीसीपी पिनाक मिश्रा म्हणाले की, कटकमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे, त्यामुळे आणखी जखमींना येथे हलवले जाण्याची शक्यता असल्याने रुग्णालय अलर्टवर आहे आणि कटकची संपूर्ण टीम तयार आहे. ते म्हणाले की, ‘येथे येणाऱ्या जखमींना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवेश मिळावा यासाठी आम्ही सुरक्षा व्यवस्था केली आहे.’ दुसरीकडे, रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना रक्तदान करण्यासाठी भद्रक येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात अनेक रक्तदाते जमले.

रात्री उशिरा झालेल्या अपघाताबाबत पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख सुकांता मजुमदार म्हणाले की, ‘आम्ही घटनास्थळी भेट देणार आहोत. आम्ही पीडितांच्या सहकार्यात त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि शक्य ती सर्व मदत करू.

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी शेजारच्या ओडिशामध्ये झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघाताप्रकरणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे, सरकार केवळ लक्झरी गाड्यांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप सीपीआय खासदाराने केला आहे. खासदार बिनॉय विश्वम म्हणाले की, ‘सरकारचे लक्ष केवळ लक्झरी गाड्यांवर आहे. सर्वसामान्यांचे गाड्या आणि ट्रॅक दुर्लक्षित आहेत. ओडिशातील मृत्यू त्याचेच परिणाम आहेत. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, असे ते म्हणाले.

हे ही वाचा >> Train Accident: एक्सप्रेस-मालगाडीची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 280 जणांचा मृत्यू; 900 जखमी

अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णन यांनी सांगितले की, ‘हा अपघात का झाला, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. याच्या मूळ कारणापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या अपघातातील जखमींसाठी औषधे आणि इतर आवश्यक साहित्य पुरवठ्याबाबत सचिव शालिनी पंडित म्हणाल्या, ‘सर्व आवश्यक प्रथमोपचार साहित्य, औषधे आणि आयव्ही द्रवपदार्थ पुरेशा प्रमाणात आहेत. तसेच मयूरभंज जिल्ह्यातील गोदामातील काही अतिरिक्त साठा तात्काळ बालासोर येथे हलवला जात आहे. आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी सतर्क आहोत.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT