Dahi Handi 2025: दहीहंडी फोडण्याची कोणी केली सुरूवात, का रचतात थरावर थर?
Dahi Handi Utsav 2025 : पंचागानुसार, यावर्षी आज 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमीच्या तिथीनुसार हा सण साजरा केला जातो.

बातम्या हायलाइट

दहीहंडी उत्सवाची सुरुवात कशी झाली?

दहीहंडी उत्सव साजरा करण्याची योग्य पद्धत कोणती?

दहीहंडी उत्सवाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
Dahi Handi Utsav 2025 : पंचागानुसार, यावर्षी आज 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमीच्या तिथीनुसार हा सण साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. देशभरात हा दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवाबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात सविस्तरपणे..
प्रत्येक वर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवमी तिथीवर देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात आणि प्रत्येक गाव-शहरातील गल्ल्यांमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात. दहीहंडी उत्सव महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये धुमधडाक्यात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, हा उत्सव द्वापार युगापासून साजरा केला जातो. पण दहीहंडी उत्सवाची सुरुवात कधी झाली? दहीहंडी उत्सव दरवर्षी का साजरा केला जातो? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
अशी झाली या उत्सवाची सुरुवात
पौराणिक कथेनुसार, द्वापार युगात भगवान श्री कृष्ण बालपणी लोकांच्या घरातून मख्खन, दही घ्यायचे आणि आपल्या मित्रांना ते खाण्यासाठी दिलं जायचं. यामुळे भगवान श्री कृष्णांच्या गवळणी नाराज झाल्या होत्या. त्यांनी दह्याचे मटके उंच ठिकाणी टांगण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर श्री कृष्ण देवाचे मित्र एकमेकांवर थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करायचे. जो ग्रुप या हंडीला फोडायचा, त्यांना विजेता घोषित केलं जात असे.
हंडी तयार करणे
एक मातीचं किंवा लोखंडाच्या हंडीला (मटक्याला) फुल, रंगीत कपडे आणि पत्त्यांनी सजवलं जातं. यामध्ये दही मख्खन, मिठाई आणि कधी कधी पैशांची नाणीही भरली जातात. या मटकीला उंचावर रस्सीला बांधून ठेवलं जातं.
हे ही वाचा >> मोठी बातमी: संजय राऊतांकडून थेट सेना-मनसे युतीची घोषणा, फक्त मुंबईतच नाही, 'इथेही' होणार युती!
गोविंदांची टोळी
मुलांचा एक ग्रुप, ज्याला गोविंदांची टोळी म्हटलं जातं. जे या हंडीला तोडतात. गोविंदा या दिवशी एक खास ड्रेस किंवा रंगी-बेरंगी कपडे घालतात आणि दहीहंडी उत्सवात सहभागी होतात.
मानवी थर लावणे
मटकी उंचावर असल्याने गोविंदा पथकाला मोठे थर लावावे लागतात. सर्वात मजबूत आणि उंच सदस्य खाली उभे राहतात. त्यानंतर त्यांच्यावर इतर गोविंदा उभे राहतात.
हे ही वाचा >> Independence Day : इंग्रजांनी 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताकडे सत्ता का सोपवली? शेवटच्या 24 तासात काय काय घडलं?
दहीहंडी तोडणे
जेव्हा गोविंदा सर्व थर लावतात. तेव्हा सर्वात वरच्या थरावर उभा राहिलेला गोविंदा हाताने किंवा लाकडी दांडक्याने मटकी फोडतो. मटकी फोडल्यानंतर दही खाली पडतं आणि सर्वजण गोविंदा आला रे आला अशा घोषणा देतात.
उत्साह आणि स्पर्धा
गोविंदा पथक दहीहंडी उत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होतात. कोणतं पथक किती जास्त थर लावतो, यासाठी हे पथक दहीहंडी उत्सवात भाग घेतात. विजेत्या पथकाला रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातं.