'मनोज कुमार' हे नाव कसं पडलं? पाकिस्तानातून भारतात आलेल्या 'भारत कुमार'ची प्रचंड इंटरेस्टिंग स्टोरी
Manoj Kumar: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं आज (4 एप्रिल) निधन झालं. बॉलिवूडमध्ये आपला खास ठसा उमटवणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याची काही रंजक गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात राहतील.
ADVERTISEMENT

मुंबई: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं आज (4 एप्रिल) वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने दोन दशकाहून अधिकचा काळ गाजवला होता. अवघ्या जगाला मनोज कुमार म्हणून प्रचलित असलेल्या या अभिनेत्याची खरी कहाणी मात्र फारच वेगळी आहे. फाळणीचं दु:ख, भारतात येऊन चित्रपट सृष्टीत मिळवलेलं स्थान या सगळ्या गोष्टी मनोज कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं दर्शन घडवतात. याचबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.
हरिकिशन गोस्वामी असलेले 'मनोज कुमार' कसे झाले?
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. पण त्यांना खरी ओळख ‘भारत कुमार’ या नावाने मिळाली. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी एबटाबाद (आता पाकिस्तानमध्ये) या ठिकाणी झाला. हरिकिशन गिरी गोस्वामी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख जवळून अनुभवले होते.
हे ही वाचा>> Manoj Kumar Death: बॉलिवूडचे ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन
लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले.

चित्रपट विश्वात आल्यानंतर मनोज कुमार यांनी आपले नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामीवरून बदलून मनोज कुमार केले. याचे कारण होते अभिनेते दिलीप कुमार. लहानपणी दिलीप कुमार यांच्या चित्रपटांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता. ते दिलीप कुमार यांचे चाहते बनले होते. ‘शबनम’ या चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज कुमार होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला होता की, जर चित्रपटात काम केले तर, स्वतःचे नाव मनोज कुमाराच ठेवू.










