जायकवाडी धरणातून 1,25,000 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग, देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश
Jayakwadi dam and Godavari river : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जायकवाडी धरणातून 1,25,000 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश
Jayakwadi dam and Godavari river : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.28) सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतलाय. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. यामुळे मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबविण्यात आले आहे.
हेही वाचा : धावत्या लोकलमधून नारळ फेकला, पूलावरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला; रुग्णालयात पोहोचताच...
देवेंद्र फडणवीसांनी आढावा बैठकीनंतर दिलेली माहिती
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती आहे.माजलगाव धरणातून 41,701 क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे. हा पूर्वी 95,000 क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आला आहे. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून 75,000 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. काही ठिकाणाहून तो 60,000 क्युसेक इतकाच आहे. उजनीमधून 1 लाख क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.
हेही वाचा : पुणे: सहकारी तरुणीला प्रपोज केलं, पण नकार मिळताच प्रचंड संतापला! रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...