Maharashtra Weather : हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे
Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला, तसेच उष्णतेची लाट वाढेल अशी देखील शक्यता वर्तवली आहे. पुढील काही तास हे महत्त्वाचे असतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात बहुतेक ठिकाणी उष्ण आणि कोरडे वातावरण राहील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हवामान विभागाने राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला
जाणून घेऊयात हवामान विभागाचा एकूण अंदाज
Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला, तसेच उष्णतेची लाट वाढेल अशी देखील शक्यता वर्तवली आहे. पुढील काही तास हे महत्त्वाचे असतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात बहुतेक ठिकाणी उष्ण आणि कोरडे वातावरण राहील, परंतु काही भागांत हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण असू शकते. जाणून घेऊया हवामान विभागाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : धाराशिव : चार दिवसांपूर्वी साखरपुडा, मेहंदीचा रंग उतरण्याआधीच नवरदेव अन् नवरी मुलीवर काळाचा घाला
कोकण :
कोकणात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. यापैकी रत्नागिरीत उष्णता जाणवेल आणि मुंबईत देखील उष्ण हवामान जाणवेल. एकंदरीत हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर या दोन जिल्ह्यांत तापमान 36 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडं राहील, तसेच पावसाची शक्यता नगण्य असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील परभणीत थंडावा कमी जाणवेल. काही प्रमाणात उष्णता जाणवेल, तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.










