लग्नाच्या 12 वर्षानंतर सुनेचे सासरच्यांवर छळाचे आरोप, हायकोर्टाचा सुनेलाच दणका, अकोल्याचं प्रकरण काय?

मुंबई तक

लग्नाच्या 12 वर्षांनंतर महिलेनं ही तक्रार केली होती. महिलेनं दावा केला की, तिच्या लग्नावेळी चांगली व्यवस्था न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा छळ केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्न चांगलं केलं नाही म्हणून सासरचे छळ करत असल्याचा आरोप

point

सुनेने सासरच्यांवर लग्नाच्या 12 वर्षानंतर आरोप केले होते

Mumbai High Court Judgement : महिला अत्याचाराचे अनेक प्रकरणं समोर येत असताना, दुसरीकडे काही वेगळी प्रकरणंही समोर येत आहेत. कायदेशीर तरतुदींचा गैरवापर केल्याच्याही अनेक घटना समोर येतात. अशातच मुंबई हायकोर्टाने अकोल्यातील एका कुटुंबाविरुद्ध दाखल केलेली FIR आणि फौजदारी कारवाई रद्द केली आहे. झालं असं की, एका महिलेनं आपल्या सासरच्या मंडळींवर, विशेषत: सासू, दीर आणि नणंद यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप केला होता.

हे ही वाचा >> Maharashtra Weather: मान्सून आता रंगात येणार, कोकणासह राज्यात घालणार धुमाकूळ

लग्नाच्या 12 वर्षांनंतर महिलेनं ही तक्रार केली होती. महिलेनं दावा केला की, तिच्या लग्नावेळी चांगली व्यवस्था न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा छळ केला. मात्र, जस्टिस अनिल एस. किलोर आणि जस्टिस राजेश एस. पाटिल यांच्या खंडपीठाने सांगितले की, लग्नाच्या 12 वर्षांनंतर असे आरोप स्वीकारता येणार नाहीत.

2010 मध्ये झाले होते लग्न

या प्रकरणात याचिकाकर्त्यांचे वकील निखिल आर. टेकाडे यांनी न्यायालयात सादर केले की, FIR आणि चार्जशीटमध्ये याचिकाकर्त्यांविरुद्ध कोणतेही ठोस किंवा स्पष्ट आरोप नाहीत. खंडपीठाने FIR आणि चार्जशीटचा आढावा घेतला असता असं आढळलं की, महिलेचे लग्न 10 डिसंबर 2010 रोजी झालं होतं. खंडपीठाने नमूद केलं, “महिलेच्या निवेदनानुसार, 2021 पर्यंत तिला दहेज किंवा इतर कोणत्याही कारणास्तव कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता. गेल्या 11 वर्षांपासून ती कोणतीही तक्रार न करता आपल्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होती.”

आरोप अस्पष्ट, बदल्याच्या भावनेतून तक्रार?

हे ही वाचा >> आरारारारा! मुंबई, ठाण्यात गारा पडणार? 'या' भागात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार

खंडपीठाने पुढे म्हटलं की, महिलेची तक्रार मुख्यत्वे लग्नावेळी चांगली व्यवस्था न केल्याच्या आरोपावर आधारित आहे. ही तक्रार लग्नाच्या 12 वर्षांनंतर स्वीकारार्ह नाही. तसंच, महिलेनं केलेले आरोप अस्पष्ट असून, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 498-ए च्या अटी या प्रकरणात लागू होत नाहीत. यामुळे खंडपीठाने सासरच्या कुटुंबाविरुद्ध दाखल FIR आणि फौजदारी कारवाई रद्द केली. न्यायालयाने असंही निरीक्षण नोंदवलं की, हे आरोप तक्रारीपेक्षा बदल्याच्या भावनेतून प्रेरित दिसतात.

कलम 498-ए म्हणजे काय?

भारतीय दंड संहितेचे कलम 498-ए विवाहित महिलांना त्यांचा पती किंवा सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक छळाशी संबंधित आहे. यामध्ये हुंड्याची मागणी किंवा कोणत्याही प्रकारे महिलेला त्रास देणे हा गुन्हा मानला जातो. या प्रकरणात, हायकोर्टाने महिलेचे आरोप अस्पष्ट आणि आधारहीन असल्याचं सांगत कुटुंबाला दिलासा दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp